• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात प्रशासनाला रक्ताच्या सह्या केलेले निवेदन सादर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 17, 2021
in कृषी, जळगाव
0
जळगावात प्रशासनाला रक्ताच्या सह्या केलेले निवेदन सादर
Spread the love

 

नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारण्यास दिरंगाई केल्याचा आरोप

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परिणामी खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदर स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे महसूल प्रशासनाला थेट रक्ताने सह्या केलेले निवेदन देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अशा परिस्थितीत तिबार पेरणी करूनही खरीप हंगामातील पिके जळून गेली असून, आता हाती काहीही लागणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकार आणि महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदत जाहीर करावी म्हणून जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रक्ताने सह्या केलेले निवेदन आज महसूल प्रशासनाला सादर केले.

पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, मका, ज्वारी, बाजरी तसेच उडीद, मूग आणि सोयाबीन यासारखी पिके करपली आहेत. आता पाऊस आला तरी पिकांना काहीही फायदा होणार नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. पूरग्रस्त नागरिकांना ज्याप्रमाणे मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीही मदतीचे पॅकेज द्यावे. थकीत वीजबिल माफ करावे, जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, अशा मागण्या निवेदनात शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन द्यायला शेतकरी आले. परंतु, तहसीलदार कार्यालयात उपस्थित नव्हते. तेव्हा शेतकरी नायब तहसीलदारांकडे गेले. निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार यांनी दिरंगाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तहसीलदार हजर नसल्याने नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले. मात्र, त्यांनी आधी अभ्यागतांसोबत चहापान केले. नंतर निवेदन स्वीकारले, असाही आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले होते.

Tags: aandolanjalgaontahasil karyalay
Previous Post

आ. चंद्रकांत पाटील यांचे पाण्यासाठी ‘धरणात’ जलसमाधी आंदोलन..

Next Post

मंदाताई खडसे यांना १८ ऑगस्ट रोजी हजार राहण्याचे समन्स; सूत्रांची माहिती..!

Next Post
जळगाव जिल्ह्यात केंद्रातील पथके ; बेहिशोबी मालमत्ता व रकमेची होणार चौकशी ?

मंदाताई खडसे यांना १८ ऑगस्ट रोजी हजार राहण्याचे समन्स; सूत्रांची माहिती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!