• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पूरग्रस्तांना लवकरच मदत मुख्यमंत्र्यांनी किशोर पाटील यांना दिले आश्वासन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 9, 2021
in Uncategorized
0
पूरग्रस्तांना लवकरच मदत मुख्यमंत्र्यांनी किशोर पाटील यांना दिले आश्वासन
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | आ. किशोर पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.तसेच भडगाव- पाचोरा-चाळीसगाव मतदारसंघात झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक निधीची तरतूद करावी अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी झालेल्या नुकसानाची माहिती घेत पूरग्रस्तांना लवकरच मदत जाहीर करण्यात येईल असे आश्वासन आ. किशोर पाटील यांना दिले आहे.

नुकसानग्रस्त झालेल्या भागाची तसेच शेतीची पाहणी दरम्यान पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असता युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी याबाबत सूचना केले आहेत.

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्यानंतर शेतकऱ्यांचे तसेच स्थानिक ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतीतील पीक संपूर्ण पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी तसेच नद्यांचे पाणी थेट शेतात शिरल्याने संपूर्ण पिकाची नासाडी झालेली आहे काही शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत त्याचे देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच डोगरी व तितुर नदीला नुकताच पुर येवून गेल्याने, शहरासह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी गावांना पुराचा चांगलाच फटका बसला होता. यात शेकडो जनावरे व पशुधनाचे नूकसान झाले होते. पहिल्या पुराच्या या जखमा ताज्या असताना पुन्हा डोंगरी व तितूर नदीला महापुर आल्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक गावांचे पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नूकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५३०० हेक्टर शेती पाण्याखाली येवून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तर ३३ पशुधन व २३३ घरांचे नूकसान झाले आहे. सतत धार पावसामुळे तालुक्यात लागोपाठ दोन पुर आल्यामुळे तालुक्यात मोेठे आर्थिक नूकसान झाले आहे.

Previous Post

निर्दोष मुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Next Post

राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे आता कोठे ? ; चित्रा वाघ यांचा सवाल

Next Post
राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे आता कोठे ? ; चित्रा वाघ यांचा सवाल

राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे आता कोठे ? ; चित्रा वाघ यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!