• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारने आपला हट्ट सोडला नाही तर निर्णायक लढा उभारणार – एस.एम.देशमुख

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2021
in धुळे, महाराष्ट्र
0
Spread the love

(धुळे राजमुद्रा वृत्तसेवा) मध्य प्रदेशमधील शिवराजसिंह चौहान सरकारने राज्यातील कोरोना बाधित पत्रकारांची सर्व काळजी घेणार असून त्यांच्यावर सर्व शासकीय आणि खाजगी रूग्णालयात मोफत इलाज करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी स्वागत केले असून महाराष्ट्र सरकारने आपला हट्ट सोडून संकट काळात पत्रकारांना मदत करावी अशी मागणी केली आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी काल एक ट्विट करून पत्रकारांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. पत्रकार विमा योजने अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेचा लाभ प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना मिळणार आहे. महाराष्ट्रात पत्रकार कोणाला म्हणायचं यावरून किस पाडला जात असताना मध्य प्रदेश सरकारने मात्र अधिस्वीकृती धारक आणि अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांना देखील योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ रिपोर्टर्सच नाही तर डेस्कवर काम करणारे पत्रकार देखील योजनेचा लाभ घेऊ शकतील.

मध्य प्रदेश सरकारने पत्रकारांना फ्रन्टलाईन वॉरियर्स म्हणून यापुर्वीच जाहीर केले असल्याने त्यांना प्राध्यान्याने लस दिली गेली. दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपये दिले गेले आणि आता मोफत इलाज देण्याची घोषणा सरकारने केली आहे. पत्रकारांबद्दलची सरकारची ही संवेदना स्वागतार्ह असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात 131 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात किमान 200 पत्रकार विविध रूग्णालयात इलाज घेत आहेत. पत्रकार बाधित झाल्याने त्यांचे कुटुंबिय बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे. पत्रकारांची अनेक कुटुंबं देशोधडीला लागली असली तरी राज्य सरकार पत्रकारांच्या हिताचा एकही निर्णय घेत नाही. पत्रकारांना लस देखील मिळत नसल्याने तरूण पत्रकार मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे. सरकारने लवकर पत्रकारांना फ्रन्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित केले नाही तर राज्यातील पत्रकार लवकरच निर्णायक लढा उभारतील असा इशाराही एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.

Tags: coronadhulemaharashtrarajmudras m deshmukh
Previous Post

रोहीत चांदोडे यांची महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना डिसेंबर पर्यंत पुर्ण करा खा.सुभाष भामरेंचा आदेश

Next Post

अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना डिसेंबर पर्यंत पुर्ण करा खा.सुभाष भामरेंचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!