• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना कोरोनाच्या गंभीर स्थितीचा आढावा असलेले पत्र पाठवले आहे. फडणवीस यांनी मुंबईतल्या कोरोना परिस्थितीचा या पत्रात उल्लेख केला असून मुंबई मॉडेलवर प्रश्न उपस्थित केलेला आहे. मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी सुरू आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेले 9603 मृत्यू लपवण्यात आले असून आकड्यांची बनवाबनवी हाच मुंबई मॉडेल आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

मुंबई मॉडेल हे बनवाबनवीचे मॉडेल आहे. अशा या बनवाबनवीच्या मॉडेलला देशाला स्वीकारावं लागेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. असेही ये म्हणाले. या पत्रामध्ये देशातील एकूण रुग्ण संख्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या असा अहवाल देत फडणवीस म्हणाले की


“देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 22 % रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. देशातील एकूण कोरोना मृत्यू पैकी 31 % मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत, तर 14 % ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्र मधून आहेत. देशात दररोज चार हजार मृत्यू कोरोनामुळे होत असताना त्यातील 850 हे फक्त महाराष्ट्रातील असतात. तर मुंबई दरवर्षी सरासरी 88 हजार मृत्यू होत असतात. यातील 20 हजार 719 मृत्यू वाढले असून केवळ 11 हजार 116 मृत्यू दाखवण्यात आले आहेत. मात्र उर्वरित 9603 कोरोना रुग्णांचा मृत्यू दडवण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षीचा हा क्रम यावर्षीही तसाच कायम आहे. आता याला महाराष्ट्र मॉडेल म्हणायचं का? आणि स्वीकारायचं का? राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र आहे असे वाटते. आता समजा मुंबईची स्थिती पाहीली तरी चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटिजेनचे प्रमाण अधिक ठेवून एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणावर लपवले जात आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार आपलं कौतुक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असून त्यांना देवाच्या भरवशावर सोडण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील हीच भयावह स्थिती सुधारल्यास केंद्र सरकारच्या संसाधना वरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल” असे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

Tags: coronadevendra fadanvismumbai modelrajmudrasonia gandhi
Previous Post

जळगाव करांनो सावधान ; कठोर कार्यवाही शिवाय पर्याय नाही – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

मविआ ला बदनाम करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न – नवाब मलिक यांचा आरोप

Next Post

मविआ ला बदनाम करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न - नवाब मलिक यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!