• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयंत पाटील यांनी केले ‘जलयुक्त शिवार’ योजनेचे कौतुक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 1, 2021
in राजकीय
0
जयंत पाटील यांनी केले ‘जलयुक्त शिवार’ योजनेचे कौतुक
Spread the love

नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा । दुष्काळी मराठवाड्यात यंदा मात्र पावसानं हाहा:कार माजवला आहे. अतिवृष्टीमुळं मराठवाड्याती शेती पिकांचं आणि जमिनीचं प्रचंड नुकसान झालंय. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील या पूरस्थितीला काही पर्यावरण तज्ज्ञांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेकडे बोट दाखवलं आहे. मात्र, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केलीय. जलयुक्त शिवारमधील काही कामं चांगली झाली आहेत. सर्वच कामं खराब नाहीत. जलयुक्त शिवारमुळे फायदे आणि तोटेही झाले आहेत, असं पाटील म्हणाले. तसंच तज्ज्ञांच्या मतावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे.

यावेळी भाजप-मनसे युतीच्या चर्चेवरुन जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. भाजपला मनसेसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप मनसेसोबत युती करायला लाजत आहे. मतदारांमुळे भाजप-मनसेसोबत युती करायला लाजत आहे, असा मिश्किल टोला पाटलांनी लगावला. तसंच शेतकऱ्यांना पैसे वाटून झाले आहेत. आता कारखानदारांकडे पैसे नाहीत. टॅक्स भरावा लागला तर कारखानदारी बंद पडेल. करदाता जगला पाहिजे, तरंच तो कर भरु शकेल. आयकर विभागाने व्यवहारिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे, असं मतही पाटील यांनी व्यक्त केलंय.

मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वादावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ हेच नाशिकचे पालकमंत्री राहणार. दोघांमधील वाद हा महाविकास आघाडीचे राज्य पातळीवरील नेते सोडवतील. अंडरवर्ल्डकडून धमकी आली की कुणी फोन केला याबाबत मला माहिती नाही. हा येवढा मोठा वाद नाही. भुजबळ असं काही करतील असं वाटत नाही, असं पाटील म्हणाले.

मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे, असं आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिलं.

 

Previous Post

बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पाचोरा तर मुलींमध्ये धुळे संघ विजयी….

Next Post

तलवार घेऊन दहशत माजविणारा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post
तलवार घेऊन दहशत माजविणारा पोलिसांच्या जाळ्यात

तलवार घेऊन दहशत माजविणारा पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!