(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) तोक्ते वादळाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुट्टीवर गेल्याने वाद निर्माण झाला आहे. परवानगी न घेता सुट्टीवर गेल्यामुळे पोलीस महासंचालकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात असून याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.
आधीच कोरोनाची गंभीर परिस्थिती, त्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा दिलेला असताना पोलीस महासंचालकांना असे कोणते महत्त्वाचे काम लागले की त्यांना सुट्टी घ्यावी लागली याबद्दल विविध स्तरावर प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेकडून पांडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.