• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सप्तश्रृंगी गडाचे दार भाविकांसाठी खुले; जाणून घ्या नियम अन् कुठे मिळेल पास?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in Uncategorized
0
सप्तश्रृंगी गडाचे दार भाविकांसाठी खुले; जाणून घ्या नियम अन् कुठे मिळेल पास?
Spread the love

नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा । भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगीगडावर रोज 28 हजार भाविकांना दर्शन देवीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.नवरात्रोत्सवाने नाशिक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. दि. ७ गुरुवारपासून मंदिरे खुले होत आहेत. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता अनेकांनी खबरदारी घेणे सुरू केले आहे. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या चांदवड येथील यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. सोबतच सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी लसीचे दोन डोस आणि ऑनलाइन पास बंधनकारक करण्यात आला आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात नांदुरी किंवा सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरविण्यास बंदी असेल आणि गडावर खासगी वाहनांनाही परवानगी आहे. नांदुरीवरून जाण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात वणीच्या गडावर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे ध्यानात घेता कोरोनाचे नियम कडक पाळले जाणार आहेत. सुरक्षित अंतर ठेवणे, प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. यात हयगय केल्यास प्रशासनाने कारवाईचा इशाराही दिला आहे. विशेषतः भाविकांनी बसचा वापर करावा. जास्त गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

Previous Post

तोपर्यंत मी लढतच राहणार; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरात ५५ रुग्णांची नोंदणी…

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरात ५५ रुग्णांची नोंदणी…

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरात ५५ रुग्णांची नोंदणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!