• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणुन घ्या;महाराष्ट्र बंदनंतर सरकार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार का?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2021
in राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काल महाराष्ट बंद पुकारला. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. लखमीपूर येथील शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला होता. मात्र, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी बंद पुकारणारं महाराष्ट्र सरकार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार काय? राज्यातील ठाकरे सरकार शेतकऱ्यांना खरोखरच मदत करणार का? किती करणार? कधी करणार? असा सवाल केला जात आहे.

लखीमपूर खीरी येथे चार शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने या घटनेच्या निषेधार्थ काल राज्यात बंद पुकारला. चांद्यापासून बांद्यापर्यंत या बंदला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आलं होतं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी दुकाने बंद केले. अनेक ठिकाणी निदर्शने केले आणि काही ठिकाणी रास्ता रोकोही केला. काही ठिकाणी बंदला गालबोटही लागलं. हा अपवाद वगळता राज्यात शांततेत बंद पार पडला.

आघाडी सरकार पुढच्या आठवड्यात पॅकेज जाहीर करू शकते. मधल्या काळात अवकाळी पाऊस झाला म्हणजे कोकणच्या अतिवृष्टीनंतर मराठवाडा, विदर्भ आणि इतर ठिकाणी जो पाऊस झाला त्याचं पॅकेज जाहीर केलं जाऊ शकतं. ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशाच जिल्ह्यांसाठी पॅकेज जाहीर होईल. कायम दुष्काळी भागात अतिवृष्टी कधी झाली नव्हती. तिथे मोठी अतिवृष्टी झाली. त्या भागासाठी पॅकेज जाहीर केलं जाईल. या भागातील पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. ई-पीक पाहणीवर बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जागेवर पंचनामा आणि शेतकऱ्यांनी पाठवलेले फोटो ग्राह्य धरून सरकार चार ते पाच हजार कोटींचं पॅकेज जाहीर करेल. हे पुरेसं नाही. गेल्या आठवड्यात राज्याला जवळपास चार हजार कोटींचा जीएसटीचा हप्ता मिळाला आहे. ती रक्कम इकडे फिरवता येईल. त्यामुळे सरकारला कर्ज काढण्याची गरज पडणार नाही, असं विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं.

Tags: bjpcongresjalgaon jilhajalgaon jilha ativrushtimaharashtranahavikas aaghadishetkari madatshivsena
Previous Post

रावेरात महाविकास आघाडीच्या बंद ला अल्प प्रतिसाद..

Next Post

पालकमंत्र्यांचे साकडे ; कोरोनाचे सावट कायमस्वरूपी दूर करण्यासह सर्वांना सुख – समृध्दी लाभू दे ..

Next Post

पालकमंत्र्यांचे साकडे ; कोरोनाचे सावट कायमस्वरूपी दूर करण्यासह सर्वांना सुख - समृध्दी लाभू दे ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!