• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विखे पाटलांचा आघाडी सरकारवर जोरदार हल्ला बोल….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2021
in राजकीय
0
विखे पाटलांचा आघाडी सरकारवर जोरदार हल्ला बोल….
Spread the love

अहमदनगर राजमुद्रा दर्पण । लखीमपूरच्या घटनेचे समर्थन कोणीही करु शकत नाही. राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तरी सरकार मदत करायला तयार नाही. महाविकास आघाडीचं अपयश समोर येत असून मंत्र्यांच्या अधिका-यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येतायत. त्याचमुळे कालचा महाराष्ट्र बंद पुकारला गेला, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. या सरकारने विश्वास गमावला आहे. आता जनताच त्यांना  त्यांची जागा दाखवून देईल, असा हल्लाबोल विखेंनी केला.

सरकारची एवढी बदनामी झालीय की सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावलाय. भ्रष्टाचाराची मालिका आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंद करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे‌. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात आहे. राज्य सरकारने कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टिका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलीय.

भ्रष्ट्राचाराचे रॅकेट आता उध्वस्त झालेच पाहिजे. राज्य सरकारचे हात भ्रष्ट्राचाराने बरबटलेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचाही यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा 72 वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रतिपादन समारंभ आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते पार पडला. त्यावेळी विखे पाटील बोलत होते.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘मन की बात’ सांगितली आहे. आता तर चक्क त्यांनी मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असं जाहीर विधान त्यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

 

Tags: vikhe patil
Previous Post

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने उडाली राजकीय खळबळ…..

Next Post

युवकांची लूट करणारे अखेर गजाआड…

Next Post
युवकांची लूट करणारे अखेर गजाआड…

युवकांची लूट करणारे अखेर गजाआड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!