• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भूल थापा देणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नका : ना. गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 28, 2021
in जळगाव
0
भूल थापा देणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नका  : ना. गुलाबराव पाटील
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने भरीव वाढीव  मदत जाहीर केली असून या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला आहे. दरम्यान, राज्य शासनाने या मदतीचा जीआर देखील जाहीर केला असून मदती त जळगाव जिल्ह्याचा समावेश झाला असून  या अनुषंगाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीची भरपाई ही दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने मिळणार असून कुणीही या संदर्भात पसरवण्यात येणार्‍या भूल थापांवर  विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

राज्य शासनाने दिनांक २६ ऑक्टोबर रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावांच्या आधारे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून २१ ऑक्टोबर २०२१ च्या निर्णयानुसार वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त ७५ टक्के एवढा असा एकूण २ हजार ८६० कोटी ८४ लक्ष ७ हजार निधी वितरीत करण्यात आला. यात नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा समावेश नव्हता. या अनुषंगाने बुधवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  व  उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अतिवृष्टी व पुराने मोठी हानी झाली असून त्यांना दिवाळीआधी वाढीव दरानुसार भरपाई मिळावी अशी मागणी केली. तर दुपारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुध्दा त्यांनी हा प्रश्‍न आक्रमक भूमिका घेऊन लाऊन धरला. यावर मंत्रीमंडळाने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वाढीव दरानुसार नुकसान भरपाई देण्याला मान्यना देऊन या संदर्भात बुधवारी रात्री राज्य सरकारने जीआर जाहीर करून जळगावसह राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी ७७४ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.

या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ही रक्कम टप्याटप्याने मिळणार असून या संदर्भात पालकमंत्री म्हणाले की, काही जण जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळणार नसल्याचा अफवा पसरवत होते. मात्र आपण या संदर्भात मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शेतकर्‍यांची व्यथा सांगितली. तर मंत्रीमंडळातही याबाबत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने तातडीने या संदर्भातील निर्णय घेऊन याचा जीआर देखील जाहीर केला आहे. यामुळे आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानत आहोत. जिल्ह्यात काही जणांनी शेतकर्‍यांना मदत मिळणार नसल्याची अफवा परवली होती. मात्र असे काही होणार नसून दिवाळीपर्यंत शेतकर्‍यांना वाढीव दरानुसार टप्प्याटप्प्याने ही मदत मिळणार आहे. आपण आजवर शेतकर्‍यांसोबत होतो. उद्यादेखील राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Tags: gulabrao patil
Previous Post

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका…

Next Post

क्रुझ ड्रग्ज प्रकरण वाढणार; नवाब मलिक अडचणीत येण्याची शक्यता!

Next Post
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर आरोप; एनसीबीच्याच अधिकाऱ्याचं निनावी पत्र

क्रुझ ड्रग्ज प्रकरण वाढणार; नवाब मलिक अडचणीत येण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!