• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडवण्यात आघाडी सरकारला अपयश: आमदार प्रसाद लाड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 30, 2021
in Uncategorized
0
एसटी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडवण्यात आघाडी सरकारला अपयश: आमदार प्रसाद लाड
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी शेतकरी आत्महत्यांचे पाप डोक्यावर असताना राज्य सरकारने आता आणखी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे पाप डोक्यावर घेऊ नये, अशी विनंती केली. वेतन वेळेवर मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १९९९ नंतर राज्यात सलग पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हापासून राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु झाले होते. त्यासंदर्भात लाड यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुळात शेतकरी आत्महत्या हे देखील काँग्रेस-राष्ट्रवादीचेच पाप आहे. १९९९ नंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान खालावून त्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. एकीकडे नेत्यांची वाढती संपत्ती व दुसरीकडे नागरिकांची दुरवस्था हे जनतेच्या डोळ्यात येऊ नये म्हणून तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी विषारी जातीय प्रचार महाराष्ट्रात सुरु केला. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटी तोट्यात गेल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे खासगी उद्योगसमूहांचा नफा गगनाला भिडत असताना, एकीकडे खासगी वाहतूकसेवा, मग त्या लक्झरी असोत वा ओला-उबेर असोत, वेगाने फोफावत असताना एसटी देखील चांगला नफा मिळवू शकते. मात्र सरकारलाच एसटी चालविण्याची इच्छाशक्ती नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. दूर डोंगरदऱ्यांमध्ये गावोगावी जाणारी एसटी बंद पडून चालणारच नाही. अशा स्थितीत निदान सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान द्यावे व कोणत्याही परिस्थितीत यापुढे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, असे आवाहनही लाड यांनी केले आहे.

Tags: Amdar prasad lad
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी माणसाशी साधला संवाद

Next Post

राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांवर हल्ला बोल!

Next Post
राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांवर  हल्ला बोल!

राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांवर हल्ला बोल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!