• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदारांची नावे गायब करण्याचा प्रयत्न सुरु; भाजपचे आमदार अमित साटम यांचा आरोप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 3, 2021
in राजकीय
0
मतदारांची नावे गायब करण्याचा प्रयत्न सुरु; भाजपचे आमदार अमित साटम यांचा आरोप
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । राज्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रभाग रचनेतील बदलामुळे मुंबईत राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेला आहे. मतदारांची नावं गायब करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय.

पालिका आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने वार्ड पुनर्रचना अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल वेगळा होता. तर चहल यांनी पाठवलेल्या अहवालात फरक आहे. महापालिका अधिकारी आणि आयुक्तांच्या लॅपटॉपचे ऑडिट करण्यात यावे म्हणजे सर्व सत्य समोर येईल, अशी मागणी साटम यांनी केलीय. मतदारांनी नावं गायब करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आयुक्तांवर कारवाईची मागणी आमदार साटम यांनी केलीय.

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम धाब्यावर बसवले. तसंच लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत फेरफार केला. त्याद्वारे मुंबईकरांची फसवणूक केली असा आरोप भाजपनं केलाय. या प्रभाग रचनेचा निषेध म्हणून आज भाजपा नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत अनोखं गांधीगिरी आंदोलन केलं.

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आली आहे. ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. तसंच पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपने केला आहे.

 

 

Previous Post

काँग्रेसचा उत्साह वाढला; भाजपसाठी धोक्याची घंटा….

Next Post

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली…

Next Post
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली…

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!