• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतुल भातखळकरांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 20, 2021
in राजकीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)

दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत न्यायालयिन याचिकांच्या गुंतागुंतीनंतर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात सध्या कमालीची संभ्रमावस्था निर्माण होत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल तर परीक्षा रद्द करणं हा उपाय असू शकत नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना किमान शाळा स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात अकरावीमध्ये प्रवेश द्यावा आणि बारावीच्या परीक्षेच्या आधी म्हणजेच २ वर्षांच्या कालावधीत केव्हाही दहावीच्या परीक्षेला बसू देऊन विद्यार्थी त्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्याचे प्रमाणपत्र द्यावे, असा पर्याय UGCचे माजी उपाध्यक्ष व आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी सुचविला. मात्र त्यांच्या या सल्ल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवर टीका केली.

“दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा परस्पर निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारला त्याच वेळी देशभरातील शिक्षणतज्ज्ञांची मते घेता आली असती. अकरावीला तात्पुरते प्रवेश देऊन परीक्षा नंतर घेण्याचा यूजीसीच्या माजी उपाध्यक्षांचा हा सल्ला त्यावेळी उपयुक्त ठरला असता. पण आडवा आला अहंकार”, अशा शब्दात आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची आणि शिक्षण मंत्रालयावर सडकून टीका केली.

UGC चे डॉ. पटवर्धन यांनी हा पर्याय सुचवण्याआधी काही तज्ज्ञ आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाचा फटका आणि शैक्षणिक घटकांची सुरक्षा लक्षात घेणं आवश्यक आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करायला हवे. या सर्व विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस १५ ऑगस्टपूर्वीच देण्यात यावेत असेही पटवर्धन म्हणाले.

Tags: 10th12thatul bhatkhalkarbhajapdr bhushan patvardhanshivsena
Previous Post

जळगाव शहरातील नालेसफाईला सुरुवात, महापौरांनी केली पाहणी

Next Post

मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही – मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आक्रमक

Next Post

मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही - मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!