• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील – संदीप देशपांडेंचा मोदी, ठाकरेंवर टोला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 20, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्यानंतर वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. सोबतच गुजरातला १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणाही केली. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”

काल झालेल्या पत्रकार परिषदेत या दोघांवर देशपांडेंनी टीका केली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील,” अशी फिरकी देशपांडे यांनी घेतली.

यापुर्वीही संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राज्यसरकाला जाब विचारला होता. “आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे. त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?,” असं देशपांडे यांनी म्हटलं होतं.

देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत केंद्राने जाहीर केली आहे. तसेच गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Tags: maharashtra navnirman senanarendra modisandip deshpandetauktaeuddhav thakre
Previous Post

मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही – मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आक्रमक

Next Post

मदत महाराष्ट्रालाही मिळणार मात्र जाणीवपूर्वक राजकारण केलं जातं – देवेंद्र फडणवीस

Next Post

मदत महाराष्ट्रालाही मिळणार मात्र जाणीवपूर्वक राजकारण केलं जातं - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!