• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समीर वानखेडेंवर नव्या आरोपांनी खळबळ; नवाब मलिकांचे गंभीर आरोप….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2021
in राजकीय
0
समीर वानखेडेंवर नव्या आरोपांनी खळबळ; नवाब मलिकांचे गंभीर आरोप….
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर तीन गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येत आहे. एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं. त्या मुलाच्या कुटुंबीयाने बेल अॅप्लिकेशन केली. त्यात एनसीबीचा कोणताही अधिकारी घरी आला नाही. त्या मुलाला घरातून बोलावण्यात आलं. खोटा गुन्हा तयार करून त्याला अटक केली गेली. ज्या मुलाला फसवलं त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहे. शेजाऱ्याशी भांडण झालं म्हणून त्याला अटक केली, असं मलिक म्हणाले.

वानखेडेंच्या दाखल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पालिकेची सर्व कागदपत्रं पाहिली आहेत. शाळेच्या दाखल्यापासून सर्व गोष्टी बाहेर काढल्या. कोर्टासमोर ठेवल्या. सर्व कागदपत्रे आम्ही त्यांच्या वकिलांना दिली आहेत. दुपारी न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर मी ट्विट करावं की नाही, पत्रकार परिषदा घ्याव्या की नाही यावर कोर्ट निर्णय देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडेंच्या वडिलांने आमच्या विरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा केला आहे. मला ट्विट करण्यापासून रोखण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

खोटी कागदपत्रं दाखवू नका. त्यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली आहे. तिथेही कागदपत्रं दिली आहेत. तिथे चौकशी होईल आणि त्यांची नोकरी निश्चित जाणार आहे. त्यांनी 1993मध्ये खाडाखोड करून कागदपत्रं मिळवली. रजिस्टर गहाळ केलं. पण हे सर्व कागदपत्रं स्कॅन आहेत. खोट्या कागदपत्रांवरच त्यांनी नोकरी मिळवली आहे. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

Tags: mumbainavab maliksameer wankhede
Previous Post

पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक सेवेला इंधन दरवाढीचा फटका…

Next Post

अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत उद्या नक्कीच वसूल होईल – शरद पवार

Next Post
अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत उद्या नक्कीच वसूल होईल – शरद पवार

अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत उद्या नक्कीच वसूल होईल - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!