• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्र्यांच्या निर्देशनातून सहा गावांना हातनूर पाण्याचे आवर्तन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2021
in जळगाव
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)

ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणी टंचाई उदभवू नये यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून भविष्यातला पाणी प्रश्न तूर्तास सोडवला जाणार असल्याचे दिसून येत आहे.

ममुराबाद, विदगाव, आवार, खापरखेडा, तुरखेडा आणि नांद्रा खुर्द या गावांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गत वर्षी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले होते. यामुळे या भागात टंचाई जाणवली नव्हती. दरम्यान, यंदा देखील टंचाईचे सावट भासू नये यासाठी या सहा गावांचे सरपंच तसेच मान्यवरांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना साकडे घातले होते. या अनुषंगाने आता हतनूर धरणातून या सहा गावांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

परिसरात असलेल्या कालव्यांच्या मदतीने हे पाणी या सहा गावच्या ग्रामस्थांची तहान भागविणार आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यातही ग्रामस्थांना पाणी टंचाई भासणार नाही. या आवर्तनात हतनूर धरणातून साधारणतः तीन दशलक्ष घनमीटर इतके पाणी त्वरित सोडण्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. सदर पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधीक्षक अभियंता व प्रशासक क.डा.जळगाव श्री. दळवी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी, उप अभियंता पाटबंधारे विभाग तसेच कार्यकारी अभियंता श्री. भैरी यांचे सहकार्य लाभले आहे. तर या आवर्तनामुळे पाणी टंचाई भासणार नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Tags: gulabrao patilhatnur damjalgaonpatbandhare vibhag
Previous Post

शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

चक्क रुग्णालयात इंजेक्शन ऐवजी सापडली गावठी बंदूक

Next Post

चक्क रुग्णालयात इंजेक्शन ऐवजी सापडली गावठी बंदूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!