• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘कोविड’मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 4, 2021
in धुळे, महानगरपालिका, राजकीय, शासकीय
0
Spread the love

धुळे राजमुद्रा दर्पण l ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

‘कोविड- 19’ या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह साहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाइन वेबपोर्टल विकसित केले असून ‘कोविड- 19’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास सानुग्रह साहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी कमीतकमी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगइन करणे आवश्यक राहील. तसेच https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळण्यासाठी लॉग इन करता येईल. केंद्र सरकारकडे ज्यांच्या ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी ‘कोविड- 19’ मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल, तर ‘कोविड 19’ मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णयान्वये, जिल्हा, महानगरपालिकास्तरावर गठित तक्रार निवारण समितीकडे तक्रार निवारण अपील करता येईल. या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेवून अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह साहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरीता वेबपोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील. जेणकरून मृत व्यक्तीच्या योग्य वारसास साहाय्य मिळावे या करीता त्याला अपील करण्याची संधी मिळू शकेल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह साहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.

Tags: कोविड-19महानगरपालिकाराजकीयशासकीयसामाजिक
Previous Post

निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे; जाणून घ्या

Next Post

अवकाळी पावसानं सर्वच हिरावल; शेतीचे मोठे नुकसान, थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या…..

Next Post
अवकाळी पावसानं सर्वच हिरावल; शेतीचे मोठे नुकसान, थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या…..

अवकाळी पावसानं सर्वच हिरावल; शेतीचे मोठे नुकसान, थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!