• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवा सेना व नेहरू चौक मित्र मंडळातर्फे पोलिसांना जूस व पाणीवाटप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2021
in जळगाव
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर नागरिक बेहाल झाले असून पोलीस यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळामध्ये सध्या व्यवसायिक आवक-जावक बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उदरनिर्वाहाची समस्याही निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर बर्‍याच सामाजिक संस्थांकडून मोलाची मदत होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हा युवा सेना व नेहरू चौक मित्र मंडळ जळगाव यांच्या एकत्रित मदतीतून सध्या शहरातील चौकाचौकात सतत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पाणी बॉटल व ज्यूसचे वाटप करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस प्रशासनावर सध्या मोठ्या प्रमाणावर जबाबदारीचा डोंगर कोसळला आहे. यातून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर कडक निर्बंध लावण्याची जबाबदारीही पोलिसांवर आहे. सर्वांनी घरात राहावे यासाठी पोलीस मात्र रस्त्यावर उन्हातानात आपले कर्तव्य बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी ज्युस आणि पाणी बॉटल जळगाव जिल्हा युवा सेना व नेहरू चौक मित्र मंडळातर्फे देण्यात येत असून पोलिसांचा उत्साह वाढवण्यात येत आहे.

जळगाव जिल्हा युवा सेना आणि नेहरू चौक मित्र मंडळ या उपक्रमासोबतच सकाळी व संध्याकाळी रोज १०० गरजूंना मोफत जेवणही पुरवत आहेत. मेहरुण तलाव, शहरातील राम मंदिर तसेच मोहाडी रोड जवळील गरीब वस्तीमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात गरीब गरजू नागरिकांवर निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता या योजनेचे नियोजन असल्याचे युवा सेनेकडून सांगण्यात आले. या उपक्रमात नेहरू चौक मित्र मंडळाची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे.

सायंकाळी पाणीवाटप प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख पियुष गांधी, उप महानगरप्रमुख जय मेहता, रिकेश गांधी, रोहित शिरसाठ, वैभव जगदाळे, दर्शन बारी, प्रसाद विसपुते, युवराज काठूरिया, किरण मेहता आदींचा ताफा या मदतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे. सामाजिक दायित्वातून गरजू नागरिकांची उपासमार होऊ नये त्याचप्रमाणे अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जबाबदारीचा डोंगर त्रासदायक ठरू नये म्हणून ही संकल्पना राबवण्यात येत असल्याचे उपजिल्हाप्रमुख पियुष गांधी यांनी सांगितले.

Tags: coronajalgaon jilha yuva senajalgaon policejay mehtalockdownneharu chauk mitra mandalpiyush gandhirikesh gandhi
Previous Post

मेहरूण तलाव परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन

Next Post

भाजपा जिल्हा ऑटोरिक्षा आघाडी तर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्षाची स्थापना

Next Post

भाजपा जिल्हा ऑटोरिक्षा आघाडी तर्फे रिक्षा चालकांकरिता ऑनलाईन कक्षाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!