• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपाल भाजपची ‘बी’ टीम ? विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका ; कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 27, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा  दर्पण | राज्याच्या विधानसभेत अध्यक्ष मिळू नये अशी भाजपची भूमिका असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदर्भात तसेच बदलण्यात आलेल्या नियमात संदर्भात अहवाल पाठविण्यात आलेला आहे. बारा आमदार निवडीच्या प्रकरणावरून अद्यापपर्यंत विषय राज्यपालांकडे प्रलंबित असताना आता मात्र पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा चेंडू राज्यपाल यांच्या कोर्टात टाकला गेला आहे. यासंदर्भातील परवानगी मिळावी यासाठी राज्य शासनातील नेते मंडळी तसेच महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे.

भाजपवर नाना बरसले

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदर्भात रविवारी काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती, त्यानंतर आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलेले आहे. मात्र याबाबत राज्यपालांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान जर राज्यपालांची पत्रावर तर ती आली नाही, तर संविधानिक पद्धतीने जे काही आम्हाला करता येणे शक्य आहे ते सर्व आम्ही करू असं नाना पटोले यांनी इशारा दिला आहे राज्यपालांना आडून विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नये अशी भाजपची भूमिका असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक उद्याच घेण्याची सरकारची तयारी आहे. अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी मतदान यांनी घेण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो घटनाबाह्य नसल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नियम बदलण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चे नियम बदल करण्यात आलेल्या आहे. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे ती प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने अवलंबलेली आहे, व स्वीकारली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते महाराष्ट्रातील विधान परिषद सभापती चे निवडणुका वाजे पद्धतीनेच होते. त्यामुळे विधीमंडळात घेतलेला निर्णय घटनाबाह्य असून तसे पत्र राज्यपालांना पाठवलेले आहे. असे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्य शासनाच्या पहिला पत्राबाबत राज्यपालांची भूमिका

जे काही नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात त्यानुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सर्व कारवाई केली जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान विधिमंडळात केलेल्या नियमबाह्य असल्याचा आक्षेप  राज्यपालांनी नोंदवला होता. याबाबत विधिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाचा स्पष्ट उल्लेख करून हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न कॉंग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आला आहे. राज्यपालांनी विधानसभेचे कामकाज आज सरकारला सहकार्य करावे अशी विनंती देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Tags: . mahavikas aaghadibjp vs mahavikas aaghadicongresjalgaonjalgaon jilhamaharashtramukhyamantri uadhav thakrenana patolerajyapal bhagat sing koushari
Previous Post

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार : परिवहन मंत्री ॲड अनिल परब

Next Post

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञाताचा हल्ला ; राजकारण तापले

Next Post

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञाताचा हल्ला ; राजकारण तापले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!