• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हतनूर प्रकल्पातील पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा : मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 26, 2022
in जळगाव, शासकीय
0
Spread the love

हतनूर प्रकल्पाच्या पुनर्वसनातील उर्वरीत १२ गावांचा नव्याने प्रस्ताव सादर करा :- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातंर्गत ३४ गावे प्रकल्पबाधीत असून हतूनर प्रकल्पातील मुळ अहवालानुसार कामे पुर्ण करण्यात आली आहेत यामध्ये नव्याने १२ गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने सुस्पष्ट असा प्रस्ताव सादर करा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज बैठकीत दिले.

मंत्रालयासमोरील सिंहगड निवासस्थानी जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातील रखडलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील,पाटोळाचे आमदार चिमणराव पाटील,पुनवर्सन विभागाचे उपसचिव धनंजय नायक,जळगावचे अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक प्रवीण महाजन,रविंद्र भारदे,कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी,नाशिक महसूलचे उपायुक्त गोरस गाडीलकर यावेळी उपस्थित होते.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,शासनाने ३४ गावे पुनर्वसीत करण्यासाठी ४० कोटी रूपयांची मान्यता दिली आहे.या ३४ गावांमध्ये काही नागरी सुविधांची कामे पुर्ण झालेली आहेत. पुनर्वसन गावांतील पुर्ण झालेली नाहीत अशी कामे तसेच ज्या कामांची दरवाढ झाली असून या कामांसाठी लागणारा अतिरिक्त निधी,नव्याने जी गावे पुनर्वसनामध्ये समाविष्ट करायची आहेत त्या १२ गावांचा सुस्पष्ट प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.ही कामे वेगोने पूर्ण करून या पुनर्वसीत गावांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठकीत दिली.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, हतनूर प्रकल्पातील पुनर्वसीत गावांची नागरी सुविधांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच शासनाकडून या ३४ गावांच्या कामासाठी ४० कोटी रूपयांची तरतूद केली होती मात्र दरवाढीमुळे या कामांसाठी अधिकचा निधी लागणार आहे त्याचबरोबर हतनूर प्रकल्प पुनर्वसन अंतर्गत नव्याने १२ गावांचाही विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.या कामांना तातडीने निधी देवून ही कामे गतीने पूर्ण करावीत अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली. *

Tags: hatnur damjalgaonmahavikas aaghadipalakmantri gulabrao patilvijay vadettiwar
Previous Post

आम आदमी पार्टीने श्रमदानं करून मनपाच्या नाकर्तेपणाचा केला जाहीर निषेध

Next Post

सिंधी कॉलनीत घरफोडी करणारे दोघे जेरबंद ; एलसीबीची कारवाई

Next Post

सिंधी कॉलनीत घरफोडी करणारे दोघे जेरबंद ; एलसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!