• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“काश्मीरमध्ये ९० चे दशक परत येत आहे” राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 4, 2022
in राजकीय
0
“काश्मीरमध्ये ९० चे दशक परत येत आहे” राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल
Spread the love

काश्मीरमधील टार्गेट किलिंगवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “१९९० च्या दशकात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती काश्मीर खोऱ्यात परत येत आहे.” गेल्या काही आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील अनेक काश्मिरी पंडित आणि हिंदूंना निशाणा बनवला आहे.

काश्मीर मधील बँक मॅनेजरची गोळी झाडून हत्या :-
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगाम मधील आरेह मोहनपोरा येथील स्थानिक देहाती बँकेत ही घटना घडली. लश्कर-ए-तैयबाची प्रतिबंधित दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांचीही हत्या :-
काही दिवसांपूर्वी, जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील रजनी बाला या ३६ वर्षीय हिंदू महिला शिक्षिकेची कुलगाममधील गोपालपोरा येथील सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याआधी, काश्मिरी पंडित करमारी राहुल भट यांच्यासह दोन नागरिक आणि तीन ऑफ ड्यूटी पोलिस कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी मारले होते.

संजय राऊत म्हणाले, “१९९० च्या दशकात जशी परिस्थिती होती तशीच आज काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. तुम्ही (भाजप) काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणण्याबद्दल बोललात आणि हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवता. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याने लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही.”

Tags: #kashmirbjpsanjay rautshivsenaTErrorist
Previous Post

तुरुंगात असलेले अनिल देशमुखांनी कोर्टाकडे एक दिवसाचा जामीन का मागितला ?

Next Post

महाराष्ट्रात दीड महिन्यात कोरोनाचे रुग्ण 7 पट वाढले! उद्धव यांनी निर्बंधांचा इशारा दिला

Next Post
महाराष्ट्रात दीड महिन्यात कोरोनाचे रुग्ण 7 पट वाढले! उद्धव यांनी निर्बंधांचा इशारा दिला

महाराष्ट्रात दीड महिन्यात कोरोनाचे रुग्ण 7 पट वाढले! उद्धव यांनी निर्बंधांचा इशारा दिला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!