• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलणार, दिग्गज खेळांडून बाहेरचा रस्ता दाखवणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 11, 2022
in राष्ट्रीय
0
Spread the love

T-20 World Cup च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेटने पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडिया आता रडारवर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता पूर्णपणे कठोर भूमिका घेण्याच्या मनस्थितीत आहे. आता वर्षभरात भारतीय संघात बरेच मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक असेल. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही हळूहळू संघातून वगळण्यात येणार आहे. मात्र, निवृत्तीचा निर्णय खेळाडूलाच घ्यावा लागणार आहे.

हार्दिक पांड्या होऊ शकतो कर्णधार

इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता. त्यानंतर त्याला प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलासा दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील T20 विश्वचषक आता दोन वर्षांनी होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला हार्दिक पांड्यामध्ये भावी कर्णधाराची झलक दिसत आहे. म्हणजेच पुढील टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार हार्दिक असू शकतो हे स्पष्ट झाले आहे.

निवृत्ती खेळाडूचा वैयक्तिक निर्णय

सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआय कोणालाही निवृत्त होण्यास सांगणार नाही. हा वैयक्तिक निर्णय आहे. पण 2023 पर्यंतच्या पुढच्या T20 विश्वचषकाबद्दल बोललो तर तोपर्यंत बहुतांश वरिष्ठ खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळताना दिसतील. तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीची घोषणा करण्याची गरज नाही. पण पुढच्या वर्षी टी-20 मध्ये तुम्हाला बरेच सीनियर खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.

रोहित-कोहली-अश्विनची विश्वचषकातील कामगिरी

यावेळी विराट कोहली 34 आणि रोहित शर्मा 35 वर्षांचा आहे. कोहलीने या विश्वचषकात आतापर्यंत 6 सामन्यात सर्वाधिक 296 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 98.66 होती. कोहलीने 4 अर्धशतके ठोकली. तर रोहित शर्माने 6 सामन्यात 19.33 च्या सरासरीने फक्त 116 धावा केल्या. त्याचवेळी तिसरा सिनियर फिरकी गोलंदाज अश्विनबद्दल बोलायचे तर त्याने 6 सामन्यात केवळ 6 विकेट्स घेतल्या.

Tags: crickett20 wcteam india
Previous Post

रक्तासाठी होणारी धावपळ थांबणार, आता लॅबमध्येच तयार होणार कृत्रिम रक्त

Next Post

शेअर मार्केटमध्ये वादळी तेजी, ‘या’ कंपनीचा शेअर बनला रॉकेट

Next Post

शेअर मार्केटमध्ये वादळी तेजी, 'या' कंपनीचा शेअर बनला रॉकेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!