• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊत म्हणाले- कारागृहात मला अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन घटलं

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई: शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने अटक केली होती. 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता झाली आहे. यानंतर आता, त्यांनी कारागृहातील आपली अनुभव सांगितले आहे. कारागृहात आपल्याला ‘अंडा सेल’मध्ये ठेवण्यात आले होते. जेलमधील काळात आपले 10 किलो वजन कमी झाल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपला कारागृहातील अनुभव सांगितला. राऊत म्हणाले, कारागृहात आपल्याला ‘अंडा सेल’मध्ये ठेवण्यात आले होते. तेथे आपल्याला 15 दिवस ऊनही दिसले नाही. बराच वेळ जेलमधील फ्लडलाइट्सच्या संपर्कात राहिल्याने आता माझी दृष्टीही कमकुवत झाली आहे, मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.

…तर अटक झाली नसती

स्वतःला ‘युद्धबंदी’ म्हणत, राऊत यांनी दावा केला, की जर आपण त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले असते अथवा ‘मूक दर्शक’ बनून बसलो असतो, तर आपल्याला अटक केली गेली नसती. मी स्वतःला युद्ध कैदी समजतो, सरकारला वाटते, की आम्ही त्यांच्यसोबत युद्ध करत आहोत. आपण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कारागृहात पाहिले. त्यांची प्रकृती ठीक नाही. सरकार केवळ विरोधी पक्षात असलेल्यांनाच कारागृहात टाकणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी आपण जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबामुळेच आहोत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीत फूट पडणार

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानावर राऊत म्हणाले, महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांवर अशाप्रकारचे आरोप करणं आणि त्यांची बदनामी करणं हे महाराष्ट्राला अजिबात मंजूर नाही. शिवसेना काय तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही याचं समर्थन करणार नाहीत. राहुल गांधींनी असं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. भारत जोडो यात्रा देशातील हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी या महत्वाच्या प्रश्नांच्या विरोधात निघाली आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मग अशावेळी वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags:   Sanjay Raut#shivsena neta
Previous Post

धक्कादायक! मुलांचे अपहरण करुन करायचे लाखोत विक्री, पोटच्या पोरांसह केला 9 बाळांचा सौदा

Next Post

18 वर्ष वय पूर्ण झाले ; मग मतदार यादीत “या” पद्धतीने करा नाव नोंदणी

Next Post

18 वर्ष वय पूर्ण झाले ; मग मतदार यादीत "या" पद्धतीने करा नाव नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!