• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे सरकार 2 महिन्यांत पडणार: भाजप मंत्र्याच्या संकेतानंतर संजय राऊत यांचा दावा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 22, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई : राज्यातील शिंदे सरकार पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. मात्र खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचं म्हटलंय. दानवे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा मध्यावधींचे वेध लागले आहेत. तर, शिवसेना खासदार संजय राऊतांनी दावनेंच्या विधानावरुन, हे सरकार 100 टक्के पडणार असल्याचा दावा केला आहे.

संजय राऊत म्हणाले, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीच आता येत्या दोन महिन्यांत राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरे बोलून जातात. त्यामुळेच त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना कधी काय होईल याचा नेम नाही, असे बोलून मध्यावधीचे संकेत दिले आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. माझ्या मनात तर हे शिंदे सरकार लवकरच पडणार, याबद्दल तिळमात्र शंका नाही. तसेच, याबाबतची काही महत्त्वाची माहितीही माझ्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

काय म्हणाले होते दानवे?

काल कन्नड येथील सभेत रावसाहेब दानवे म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही.’ रावसाहेब दानवेंच्या याच वक्त्यावरुन खासदार संजय राऊतांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.

जामीन मिळाल्यानंतर राऊतांची दिल्लीवारी

येत्या काही दिवसांत शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसर टप्पा पार पडणार आहे. मात्र या सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी नाट्य रंगत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी हा दावा केल्याची चर्चा आहे. गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जामीन मिळाल्यनंतर शिवसेना खासदार संजय राऊत पहिल्यांच दिल्लीत गेले. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेट असल्याची चर्चा आहे. मात्र राऊतांनी दिल्लीत पक्षाच्या आणि इतर कामांसाठी आलो आहे. असं म्हटले आहे.

Tags:   Sanjay Rautbjpshivsena
Previous Post

खळबळजनक! पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, दाऊदच्या हस्तकांकडून मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज

Next Post

जळगावात गुलाबी थंडीत राजकारण तापले; नेत्यांच्या हायव्हेल्टेज ड्रामामुळे जनता हैराण

Next Post

जळगावात गुलाबी थंडीत राजकारण तापले; नेत्यांच्या हायव्हेल्टेज ड्रामामुळे जनता हैराण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!