• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! 4 कोटी बालकांना गोवरचा धोका, WHO ने दिला इशारा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 26, 2022
in Uncategorized
0
Spread the love

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या विळख्यातून जग आता हळूहळू बाहेर पडत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना आणि त्याच्या लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्वजण व्यस्त असतानाच आता गोवरच्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे. सध्या महाराष्ट्रात देखील गोवरचं प्रमाण वाढलं असून लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असल्याचं दिसून येत आहे.

नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे, जगभरातील जवळपास 4 कोटी मुलांनी गोवरचा डोस चुकवला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या आकडेवारीनुसार जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अजून मिळू शकलेला नाहीये. तर दुसरीकजे 1.5 कोटी मुलांना गोवरच्या लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही.

2021 मध्ये 90 लाख प्रकरणे

2021 मध्ये गोवरची जवळपास 90 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली होती. यामध्ये 1 लाख 28 हजार मृत्यूची नोंद करण्यात आली. माहितनुसार, 22 देशांमध्ये या आजाराचा प्रभाव पहायला मिळाला. कोरोनाच्या लसीकरणामुळे गोवरच्या लसीकरणावर परिणाम झाला आणि 2022 पर्यंत जगातील अनेक भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याचं समोर आले आहे.

संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक

कोरोना सारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यात 18 देशांमध्ये 6 कोटी डोस चुकले किंवा हे डोस देण्यास उशीर झाला. गोवरचा संसर्ग हा सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक मानण्यात येतो. मात्र यावर प्रभावी लस आहे त्यामुळे लसीकरणाच्या माध्यमातून हा संसर्ग टाळता येऊ शकतो. गोवरचा संसर्ग टाळता यावा म्हणून जगातील 95 टक्के लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळणं आवश्यक मानलं जातं. मात्र प्रत्यक्षात फक्त 81 टक्के मुलांना गोवरचा पहिला डोस मिळाल्या समोर येतंय तर फक्त 71 टक्के मुलांना 2 डोस मिळालेत. 2008 नंतर पहिल्यांदाच इतक्या कमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 13 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात आणि खासकरून मुंबईमध्ये गोवराची संसर्गाची भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गोवरच्या संसर्गाची 200 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. याशिवाय गोवर आणि रुबेलाचं वाढतं प्रमाण पाहता केंद्र सरकारने राज्यांना एडवायजरी जारी केली आहे.

Tags: govarhealthWHO
Previous Post

“महिलांनी कपडे घातले नाही तरी चांगल्या दिसतात”, रामदेव बाबांची जीभ घसरली

Next Post

8 वर्षीय मुलीची गुगलला टक्कर! तिसरीत शिकते, ज्ञान मात्र पीएचडी करणाऱ्यांइतके

Next Post

8 वर्षीय मुलीची गुगलला टक्कर! तिसरीत शिकते, ज्ञान मात्र पीएचडी करणाऱ्यांइतके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!