• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात वाळू माफिया जोमात; हजारो हेक्टरवरील शेती होतेय ओसाड

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 16, 2022
in जळगाव
0
जळगावात वाळू माफियांकडून गुजरातच्या पावत्यांचे सिंडीकेट
Spread the love

जळगाव: जिल्ह्यात अवैध वाळू उपशामुळे हजारो हेक्टर शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या भागातील वाळू उपशामुळे नांद्रा, आव्हाने, खेडी, वडनगरी, कानळदा याभागातील मोठ्या प्रमाणात शेती उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

मोठ्या प्रमाणात जलपातळी खालावत असून यामुळे शेतीप्रधान असलेला परिसर उध्वस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. शासन आणि प्रशासन याबाबत मात्र झोपेचे सोंग घेऊन आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास

या भागातून केळीचे उत्पादन होत असताना जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनाच्या बाबतीत जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुकीत भ्रष्टाचार केला जात आहे. जिल्ह्यात अति वाळूउपसा, वाळूचोरी यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. शेतरस्ते खराब झाले असून, नदीकाठची शेती जलसाठे घटल्याने उजाड झाली आहे.

नदीकाठच्या विहिरी कोरड्याठाक

जिल्ह्यात तापी, गिरणा नदीतून मागील २५ ते ३० वर्षे वाळूचा बेसुमार उपसा झाला आहे. गिरणा नदीत जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, चाळीसगाव भागांत तर तापी नदीत यावल, जळगाव, अमळनेर, चोपडा भागांत मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे २५ ते ३० फुटाचे आहेत. त्यात अनेक शेतकरी, बालकांना जीव गमवावा लागला आहे. नदीतील वाळू संपत आल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पाणी वाहून जाते. नदीकाठच्या विहिरी जानेवारीतच कोरड्या होतात. हा प्रकार सर्वत्र घडत आहे.

वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची लागली वाट

वाळू वाहतूक सतत सुरूच राहिल्याने तापी, गिरणाकाठचे अनेक शेतरस्ते, डांबरी रस्ते खराब झाले आहेत. ते वर्षानुवर्षे दुरुस्त केले जात नाही. शासन फक्त महसूल शोधते. या प्रकाराबाबत कुणी गांभीर्याने कारवाई करीत नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आता वाळूची चोरी, अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. वाळूमाफियांनी अक्षरश: धुडगूस घातला असून, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

Tags: jalgaonvalu chori
Previous Post

जिल्हाधिकारी रजेवर ; प्रांताधिकारी ,तहसीलदारांना दिसत नाही का ?

Next Post

पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक, जळगावातील व्यवसायिकास 31 लाखांचा गंडा

Next Post

पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक, जळगावातील व्यवसायिकास 31 लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!