• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अदानी समूहाच्या कंपन्यांवर छापेमारी सुरु, विरोधकांनी सरकारला घेरले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 9, 2023
in Uncategorized
0
अदानी समूहाच्या कंपन्यांवर छापेमारी सुरु, विरोधकांनी सरकारला घेरले
Spread the love

हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी उद्योग समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अहवालानंतर अदानी उद्योग समुहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. दरम्यान, आता अदानी समुहाला आणखी मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सिमेंट वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आणि कर विभागाने अदानी समूहाच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत.

हिमाचल प्रदेशातील अदानी विल्मार ग्रुपच्या कंपन्यांवर या पथकांनी धाडी टाकल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षिण अंमलबजावणी विभागाचे पथक बुधवारी सायंकाळी उशिरा परवानू येथील अदानीच्या स्टोअरमध्ये पोहोचले जेथे अदानी समूहाच्या रेकॉर्डची छाननी करण्यात आली. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाचे शेअर्स कोसळले. मात्र, बुधवारी काही प्रमाणात रिकव्हरी पहायला मिळाली. स्टॉक खाली आल्यानंतर गौतम अदानी जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. अदानी मुद्द्यावरून विरोधक सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हिमाचलमधील अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर आता छापेमारी सुरु झाली आहे.

शेअर्समध्ये सातत्याने घसरण

अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारीला अदानी ग्रुपवर फसवणुकीचा आरोप करत अहवाल जारी केला होता. हा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. तथापि, बुधवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 19.76 टक्क्यांनी वाढ दर्शवत 2,158.65 रुपयांवर बंद झाले. यासह, अदानी समूहाच्या कंपनीचे बाजार भांडवल 40,601.14 कोटी रुपयांनी वाढून 2.46 लाख कोटी रुपये झाले आहे.

विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

अदानी समूहाशी संबंधित आरोपांना उत्तर न दिल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अदानींना वाचवल्याचा आरोप केला. लोकसभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारतातील जनता नकारात्मकता स्वीकारू शकत नाही. त्याच्यावर लावलेल्या ‘खोट्या आरोपांवर’ कधीही विश्वास ठेवणार नाही.

Previous Post

लखपती होण्याची संधी! केवळ 58 रुपये जमा करा आणि 8 लाखांचा निधी मिळवा; जाणून घ्या काय आहे सूत्र

Next Post

PF खात्यातून पैसे काढतायं, तर मग जाणून घ्या नवा नियम

Next Post
PF खात्यातून पैसे काढतायं, तर मग जाणून घ्या नवा नियम

PF खात्यातून पैसे काढतायं, तर मग जाणून घ्या नवा नियम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!