धरणगाव: किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार चांदसर (ता. धरणगाव) येथे घडला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. याघटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईदास माधवराव शिंदे (वय 42, चांदसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, संशयित साहिल आयुब पठाण, अयुब बाबन पठाण (दोघ.रा. चांदसर ता. धरणगाव) यांनी तुमची कोळीवाडा भागातील घरामध्ये भरलेली कपाशी खाली करून घ्या, माझ्या आई-वडिलांना कपाशीचे रात्रभर किडे चावतात त्यामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही. तक्रारदाराने कापाशीला भाव आला की, विकून टाकु असे बोलल्याचा दोघांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
कपाशी काढण्याचे सांगितल्याने मारहाण
दुसऱ्या गटातर्फे आुब पठाण यांनी तक्रार दिली आहे. यात भाईदास माधवरा शिंदे, मनोहर शिवदास शिंदे (दोन्ही रा.चांदसर, ता. धरणगाव) यांना म्हटले की, तुम्ही माझ्या घराशेजारी कपाशी भरली आहे. कपाशीमध्ये किरकोडे पडलेले आहेत. कपाशीतील किरकोडे हे आई-वडिल यांना चावल्याने खाज येत असून ते रात्रभर झोपू देत नाही, असे बोलण्याचा त्यांना राग आल्याने दोघा संशयीतांनी शिविगाळ करुन चापटाबुक्कांनी मारहाण करीत आम्ही कपाशी घरातुन काढणार नाही, तुला जे कारयचे ते कर अशी धमकी दिली. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारींवरून अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास हवालदार विजय चौधरी करीत आहेत.