• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबरावांची गर्जना ; नगराध्यक्ष आमचाच होणार…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 28, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
पालकमंत्री गुलाबरावांची गर्जना ; नगराध्यक्ष आमचाच होणार…
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील नशिराबाद येथील नगरपालिकेचे नोटिफिकेशन या महिन्याच्या अखेरीस निघणार असून येथील पहिला नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असणार आहे. कार्यकर्त्यांनी सुक्ष्म नियोजनासह एकदिलाने प्रयत्न करून भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. युवक हे परिवर्तनातील सर्वात महत्वाची भूमिका निभावणार असून त्यांनी आगामी निवडणुकीत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते नशिराबाद येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

नशिराबाद नगरपालिकेची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असून या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. यात ते म्हणाले की, जिल्हा परिषदेकडचा रिपोर्ट हा बाकी असून आपण स्वत: हा अहवाल उद्या मंत्रालयात घेऊन जात आहोत. यामुळे या महिन्याच्या अखेरीस नशिराबादला नगरपालिका होणार असल्याचे निश्‍चीत आहे. या आगामी निवडणुकीला सामोरे जातांना शिवसैनिकांनी सुक्ष्म नियोजनाला महत्व देण्याची गरज आहे. वेळप्रसंगी गनीमी काव्याचा वापरू करून आपण निवडणुकीत यश संपादन करण्याचे पूर्ण प्रयत्न करावेत. यासाठी युवा सेवा व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सदस्य नोंदणीला प्राधान्य द्यावे. निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सुक्ष्म नियोजन हा घटक सर्वात महत्वाचा आहे. याच्या मदतीने आपण निश्‍चीतच निवडणुकीत बाजी मारणार आहोत.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नशिराबाद येथे मुस्लीम मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायाचा शिवसेनेबाबतचा दृष्टीकोन अलीकडच्या काळात बदललेला आहे. आता लोक जात व धर्माच्या पलीकडे विकासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण हे धरणगाव येथील आहे. तेथे ७० टक्के हिंदू तर ३० टक्के मुस्लीम समाज असतांनाही सलीम पटेल यांच्यासारख्या शिवसैनिकाला लोकांनी निवडून दिले ते त्यांच्या विकासाच्या व्हिजनवरच ! यामुळे नशिराबादमध्येही विकासाच्या बळावरच आपण विजय संपादन करणार असल्याचा आशावाद ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी युवक हे आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असे नमूद केले. ते म्हणाले की, निवडणुक प्रक्रियेत युवक हे परिवर्तनाचे काम करत असतात. प्रत्येकाने आपला व्यवसाय व रोजी-रोटी सांभाळून राजकारणात सक्रीय व्हावे. आगामी निवडणुकीत तरूणाईच्या बळावर शिवसेना विजय संपादन करणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आधीच्या नशिराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी ग्रामस्थानी केल्या असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली असून याची योग्य ती चौकशी होणार असल्याची महत्वाची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख तथा जळगांव मनपा चे माजी महापौर विष्णु भंगाळे यांनी युवासेना व शिवसेना व महिला आघाडी चे मजबूत संघटन बांधणी बाबत कानमंत्र दिला तर युवासेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू खंडारे यांनी केले. प्रास्ताविक शहर प्रमुख  विकास धनगर यांनी केले तर आभार युवासेनेचे चेतन बऱ्हाटे यांनी मानले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजु चव्हाण, शहरप्रमुख विकास धनगर,युवासेना शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, संगायो सदस्य चंदु भोळे, कैलास नेरकर, संघटक आबा माळी, नितीन बेंडवाल, नितीन भोई, मोहन कोलते, दिपक बोंडे, महेंद्र कोळी,  विशाल सोनवणे, मयुर झटके, दिपक सपकाळे, संजय देशमुख, सोहन पाटील,सोपान कोळी, राज बेंडवाल, मनोज नाथ, दर्शन झटके, प्रकाश कनगरे, दिनेश सावळे, निलेश धनगर, युवासेनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते.

Tags: jalgaonmaharashtranashirabadpalakmantri gulabrao patilshivsenashivsena jalgaon
Previous Post

एकनाथ खडसे यांचे राजकीय पुनर्वसन केव्हा होणार??

Next Post

फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही – संजय राऊत.

Next Post
फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही – संजय राऊत.

फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही – संजय राऊत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!