• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नऊ महिन्यात अपत्यही होते, आता तरी आम्हाला विसरा; शिवसेना मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 13, 2023
in Uncategorized
0
नऊ महिन्यात अपत्यही होते, आता तरी आम्हाला विसरा; शिवसेना मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
Spread the love

मुंबई : राज्यात किती दिवस बंड झाले, बंड झाले यावर बोलणार. आता तरी आम्हाला विसरा. किती दिवस आम्हाला असे छळणार, असे म्हणत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जोरदार पलटवार केला आहे. मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, गेल्या नऊ महिन्यापासून तु्म्ही तेच सांगता आहात. किती दिवस बंड झाले बंड झाले यावर बोलणार. 9 महिन्यात लग्न झाल्यावर अपत्यही होते. एखाद्या घरात तरुणाचा मृत्यू झाला तर 10 दिवसात विसरतात. आता तरी आम्हाला विसरा. किती दिवस लोकांना असे छळणार. बंद करा आता हे. बंड झाले, उठाव झाला 9 महिने होऊन गेले. आता पक्षबांधणीकडे लक्ष द्या. पुन्हा तुमचे सरकार कसे येईल याकडे जोमाने लक्ष द्या. तेच तेच बोलणे ऐकून आता लोक टीव्ही पाहायलाही कंटाळले आहेत.

विकासाबाबत का बोलत नाही

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून नऊ महिने झाले तरी तुम्ही अजूनही तेच सांगत आहात. मात्र राज्याच्या विकासाबाबत तुम्ही काहीच का बोलत नाहीत. तुमच्या या टीकेमुळे आता राज्यातील जनताही कंटाळली आहे. त्यामुळे आता पक्ष वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन म्हणाले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांना अटक होणार होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे.

Previous Post

जळगावच्या राजकारणात खळबळ; भाजपाचे चार नगरसेवक अपात्र

Next Post

एक एक आमदार शिंदे सरकारला सोडून जातील, आमदार एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Next Post
मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र, एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

एक एक आमदार शिंदे सरकारला सोडून जातील, आमदार एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!