• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत हार आणि फुले अर्पण करण्यावरील बंदी उठवणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 22, 2023
in Uncategorized
0
साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत हार आणि फुले अर्पण करण्यावरील बंदी उठवणार
Spread the love

अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. आता लवकरच फुले, हार आणि प्रसाद आणण्यावरील बंदी हटवण्यात येणार आहे. म्हणजेच साईभक्तांना आता मंदिरात जाताना हार, फुले आणि प्रसाद घेता येणार आहे. यासाठी परवानगी देण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. आता साई संस्थानकडून भाविकांना माफक दरात फुले विकली जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून थेट फुले खरेदी करून मंदिर परिसरात साईभक्तांना फुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे एकीकडे साई भक्तांची होणारी लूट थांबेल तर दुसरीकडे शेतमालाला योग्य भावही मिळेल.

दोन वर्षांपूर्वी साई मंदिरात फुले, हार, नैवेद्य आणण्यावर बंदी घालण्यात आली होती. कोविडमुळे ही बंदी लागू करण्यात आली होती, जी आजपर्यंत सुरू आहे. या बंदीमुळे शिर्डीतील शेकडो फुलांचे व्यापारी आणि आजूबाजूच्या सुमारे 400 एकर क्षेत्रात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आठ महिन्यांपूर्वी बंदी हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते.

महसूल मंत्र्यांनी स्थापन केली समिती

या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्र्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. साईभक्तांना हार, फुले आणि प्रसाद अर्पण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही सातत्याने केली जात होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन समितीने आपला अहवाल तयार केला. बंदी उठवण्यासाठी साई संस्थानने पुढाकार घेत यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला. या समितीच्या अहवालाच्या आधारे आता साई संस्थानच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा साईबाबांना फुले व हार अर्पण करता येणार आहे. या निर्णयाला मान्यता मिळावी यासाठी साई संस्थानने न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर कोरोनाच्या काळात सुरू झालेला हा निर्बंध उठवला जाणार असून, भाविकांना पुन्हा एकदा मंदिरात फुले, हार आणि प्रसाद घेऊन बाबांच्या चरणी प्रसाद घेण्याची संधी मिळणार आहे.

Previous Post

कर्मचाऱ्यांना येणार ‘अच्छे दिन’, आठवड्यातून फक्त 4 दिवस काम, तीन दिवस सुट्टी

Next Post

वाढत्या तापमानामुळे ‘या’ चार आजारांचा धोका, जाणून घ्या कसा कराल बचाव

Next Post
सावधान! राज्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता, हवामान विभागातर्फे अलर्ट

वाढत्या तापमानामुळे 'या' चार आजारांचा धोका, जाणून घ्या कसा कराल बचाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!