• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार’’, नितेश राणेंचा सनसनाटी दावा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 7, 2023
in Uncategorized
0
सभेत घुसा आणि परत जाऊन दाखवा; संजय राऊतांचं गुलाबरावांना प्रतिआव्हान
Spread the love

मुंबई: नारायण राणेंचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना नितेश राणेंकडूनही तितक्याच बेछूटपणे प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात कुठलाही रस नसून संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्याबाबत धक्कादायक दावा करताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला असं कळवलंय की, आता काय उद्धव ठाकरेंचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिलेला नाही. आता ते मला खासदार बनवू शकत नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिलेला नाही. म्हणून माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्या.

संजय राऊत हे बाळासाहेबांचे झाले नाहीत

ज्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला तेव्हा संजय राऊत यांना त्यांच्यासोबत बसायचं होतं. त्यामुळे त्यादिवशी सकाळपासून संजय राऊत शरद पवार यांच्याशी संपर्क साधत होता. पण शरद पवार हे फोन उचलत नव्हते. त्यानंतर संजय राऊत संध्याकाळी तडकाफडकी सिल्व्हर ओकवर गेले. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय की संजय राऊत हे साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत बसलेले होता. संजय राऊत हे बाळासाहेबांचे झाले नाहीत. ते तुमचेही होणार नाहीत. राऊत यांनी बाळासाहेबांच्या काळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात भांडणं लावली. त्यानंतर आता तेच उद्धव ठाकरेंच्या कुटुंबात करताहेत. संजय राऊत हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, तेव्हा त्यांचे खरे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. तसेच एका माणसामुळे आपण किती लोकांना तोडलं याची जाणीव उद्धव ठाकरेंना होईल.

Previous Post

आता पेट्रोल-डिझेल विसरा! कचऱ्यावर धावणार वाहने, या शहरात राबविली जाते अनोखी योजना

Next Post

चाळीसगावात धाडसी घरफोडी: सोन्याच्या दागिण्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

Next Post
अमळनेरात दरोड्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी केली एकास अटक, सहा जणाविरोधात गुन्हा दाखल

चाळीसगावात धाडसी घरफोडी: सोन्याच्या दागिण्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!