• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Big Breaking : … तर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार अपात्र ठरणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा सर्वात मोठा दावा?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 11, 2023
in Uncategorized
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसह अयोध्येला रवाना; फडणवीसांचे शिलेदारही सहभागी
Spread the love

मुंबई : आमदार अपात्र ठरल्यावर सरकार आणि गद्दारांचा गट संपुष्टात येईल. शिवसेनेचा नेता म्हणून मला या गोष्टीची खात्री आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतील. हे 16 आमदार अपात्र ठरणार असतील तर उरलेले 24 आमदारही अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार क्षणभरही राहणार नाही. हे सरकार जाईल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना दावा केला आहे. सत्ता संघर्षाच्या निकाला आधी त्यावर भाष्य करणं हा मूर्खपणा आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. निर्णय माझ्याकडेच येईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणत असतील तर असं बोलणं मूर्खपणाच आहे. असं फडणवीसच म्हणतात ते फडणवीस आणि नार्वेकर यांनी पाहून घ्यावं, असं संजय राऊत म्हणाले.

मूर्खांना आवरलं पाहिजे

निकाला आधी फडणवीसच प्रतिक्रिया देत आहेत. अनेक दिवसांपासून तेच बोलत आहेत. आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. निकाल आमच्या बाजूने लागेल असं ते म्हणत आहेत. हा मूर्खपणा कोण करत आहे? आता त्यांना बुद्धी सूचली असेल तर त्यांना सत्याची जाणीव झाली आहे. ते आणि ज्यांना त्यांनी मांडीवर घेतले ते मूर्ख सगळे बोलत आहेत की निकाल आमच्या बाजूने लागणार. असं बोलणं न्यायालयचा अपमान आहे. तेच म्हणतोय. निकालाच्या आधी बोलणं मूर्खपणा आहे तर फडणवीस यांनी मूर्खांना आवरलं पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.

आजच्या फैसल्याने स्पष्ट होईल

आम्ही निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत. सर्वोच्च न्यायालय संविधानाची लोकशाहीची हत्या करणार नाही. या देशात लोकशाही आहे की नाही. या देशात स्वातंत्र्य टिकलं की नाही हे आजच्या फैसल्यातून स्पष्ट होईल. या देशात संसद विधानसभेचं महत्त्व आहे की नाही? या देशात न्यायालय स्वतंत्र आहे की नाही हे आज स्पष्ट होईल. आजच्या फैसल्यावर स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

Previous Post

Job Recruitment: मुंबईत सरकारी नोकरीची संधी; 5182 जागा भरल्या जाणार

Next Post

Big Breaking : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे

Next Post
बाबरीवरुन राजकारण तापले; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल, राजीनाम्याची केली मागणी

Big Breaking : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!