मुंबई (राजमुद्रा) : – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात बदल घडेल आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली ही चार राज्य निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा निर्णायक ठरेल, महाराष्ट्रात महाविकास आघाडी 48 पैकी 35 प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे, असं भाकित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या जागावाटपाता आपली भूमिका योग्यरितीने बजावली आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
युती म्हटली की एखाद दुसऱ्या जागेवरुन वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदार संघ आपल्याला सुटवा असं वाटतं आणि प्रत्येकाला वाटतं की इथे आमचीची ताकद आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत.
शिवसेनेसाठी मुंबई महत्त्वाची आहे, शिवसेना मुंबईत चार जागा लढणार आहे असं सांगत संजय राऊत यांनी या जागा आपल्याच असल्याचं ठणकावलं आहे.