• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“उमेदवार बदलवायला हवे होते,आरक्षण, शेतकर्यांच्या प्रश्नांमुळे फटका”; गिरीश महाजनांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Team Rajmudra by Team Rajmudra
June 3, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा) : – लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचे निकालसमोर आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विविध एक्झिट पोल समोर आले आहेत.

या पोलनूसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे दाखवले जात आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आणि सांगितल्याप्रमाणे ‘चारशे पार’चा आकडासुद्धा पार करणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. मात्र किमान 35 जागा महायुतीला मिळतील, उद्या तुम्हाला ते पाहायला मिळेल, असंही गिरीश महाजन यांनी सांगितले. राज्यात कमी जागा येत आहेत, हे खरं आहे. यामागील महत्वाचं कारण म्हणजे वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि दंआरक्षणाचा प्रश्न असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. काही ठिकाणी उमेदवार बदलायला पाहिजे होते, ते मात्र झालं नाही, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी होत असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितले. गिरीश महाजनांच्या या विधानमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर देखील टीके केली. एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नाही. गिरीश महाजन जे बोलत आहेत, ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही- एकनाथ खडसे

एक्झिट पोलचा निकाल पाहता 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी केलं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसतय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे खडसे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी माझा आणि सी व्होटर्सचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोल्सचा निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.

मविआ आणि महायुतीमध्ये रस्सीखेच

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. यानंतर शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेला होता. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला मोठे यश मिळेल, असा अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात दिसली रस्सीखेच. महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज. महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य. मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज. शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य. 2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता. शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचा यंदाही १०० टक्के निकाल; विशेष प्राविण्यासह सर्व विद्यार्थी उत्तीर्ण

Next Post

राज्यात फेरबदल सुरू ; नाशिक महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे यांचे नियुक्ती

Next Post

राज्यात फेरबदल सुरू ; नाशिक महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे यांचे नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!