• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल ; अशोक जैन

Team Rajmudra by Team Rajmudra
September 25, 2024
in जळगाव
0
भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल ; अशोक जैन
Spread the love

राजमुद्रा : ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली या कामगिरीमुळे भारतीयांना जवळपास 100 वर्षानंतर सुवर्णपदक मिळाले या सुवर्णक्षणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार समितीचे सदस्य अशोक जैन व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी कौतुक केले.

भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार समितीचे सदस्य अशोक जैन म्हणाले, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाने साधलेला अपूर्व यश हा भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे.अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे.या विजयामागे केवळ खेळाडूंचा नाही, तर प्रशिक्षक, व्यवस्थापक, संघाचे पदाधिकारी, आणि खेळाच्या प्रत्येक टप्प्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. संघाच्या या संघटित प्रयत्नांमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे.

भारतीय बुद्धिबळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल हा विजय केवळ एका स्पर्धेचा नाही, तर भारतीय बुद्धिबळाच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशाने नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, आणि देशभरात बुद्धिबळ खेळाच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ होईल. या विजयामुळे भारत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर एक अग्रगण्य शक्ती बनत आहे, आणि हे यश आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

चेस ऑलिंपियाड मधील सर्व सहभागी प्रतिभाशाली खेळाडू अर्जुन एरीगैसी, डी गुकेश,आर प्रगनानन्धा, विदित गुजराथी, हरीकृष्ण पेंटाला व महिला गटातील खेळाडू हरीका द्रोणावल्ली, आर वैशाली, तानिया सचदेव, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल यांनी जागतिक स्तरावर यश प्राप्त केले यामुळे भारतीय शतरंजचे भविष्य उज्ज्वल आहे.या सर्व विजेत्या खेळाडूंचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. चेस ऑलिम्पियाडचे कप्तान म्हणून ग्रैंड मास्टर अभिजीत कुंटे आपले नेतृत्व अद्वितीय आहे. आपल्या मार्गदर्शनात भारतीय टीमने अनेक महत्त्वाच्या यशांचे शिखर गाठले आहे. आपली रणनीती, समर्पण आणि प्रेरणा खेळाडूना नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करते. आपल्या कामगिरीसाठी आपल्याला मनःपूर्वक अभिनंदन!

विशेष म्हणजे चेस ऑलिम्पियाड विजेता विदित गुजराथी ला शतरंज प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात सहकार्य करण्याची संधी जैन इरिगेशन ला मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे. आज त्याच्या यशस्वी घोडदौडीला पाहून हृदयभरून येतं, आणि त्याच्या प्रगतीने आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. त्याची मेहनत, समर्पण आणि यश खरोखरच प्रेरणादायी आहे.असे त्यांनी म्हटले. तसेच आमच्या सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना, आणि संपूर्ण संघाला हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित असून, भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक विजय हा देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही संघांनी – पुरुष आणि महिला – अत्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली प्रतिभा तर सिद्ध केलीच, पण मानसिक कणखरपणा आणि सांघिक कार्यातून हे सिद्ध केले की भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती बनला आहे असे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी म्हटले.

पुरुष संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी सातत्याने प्रत्येक सामना अचूक रणनीती आणि एकाग्रतेने हाताळला. त्याच्या अनेक खेळांमधील निर्णायक चाली पाहून संपूर्ण जगाने त्याच्या कौशल्याचे कौतुक केले. महिला संघानेही दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कठीण परिस्थितीतही धीर सोडला नाही. त्याच्या खेळात संयम आणि जिद्द दिसून आली.

या दोन भारतीय संघांच्या विजयावरून देशातील बुद्धिबळाची पातळी सातत्याने वाढत असून, भारतीय खेळाडूंमध्ये विश्वविजेते बनण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ही कामगिरी येणाऱ्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल.भारतीय खेळाडू जागतिक शतरंज ऑलिंपियाड, ग्रँडमास्टर स्पर्धा, आणि इतर प्रमुख स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या अधिक संख्येने युवा खेळाडूंनी यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे पुरुष(ओपन) व महिला या दोन्ही गटांत भारताने एकाच वेळी पहिल्यांदाच विजयी सुवर्ण पदक प्राप्त करुन भारताचे वाश्विक स्तरावर वर्चस्व प्राप्त केले आहे. आणि या दृष्टीने त्यांना “गोल्डन जनरेशन”म्हणता येईल

चेस किंवा शतरंज हा मूळ भारतीय खेळ आहे, आणि त्याची उत्पत्ती भारतात प्राचीन काळात झाली. शतरंजचे मूळ रूप संस्कृतमध्ये “चतुरंग” म्हणून ओळखले जात असे. सध्याची भारतीय युवा खेळाडूंची पिढी अत्यंत प्रतिभाशाली आहे.अर्जुन एरिगैसी,डी गुकेश, प्रज्ञाननंदा, विदित गुजराथी, दिव्या देशमुख, टी.आर. वैशाली सारखे खेळाडू जागतिक स्तरावर यशस्वी होत आहेत,असे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी म्हटले.

Tags: jalgaonmaharashtra
Previous Post

जळगाव महानगरपालिका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

Next Post

अजित पवार गटाच्या नरहरी झिरवळ यांच्या मुलाची शरद पवार गटात एन्ट्री फिक्स

Next Post
अजित पवार गटाच्या नरहरी झिरवळ यांच्या मुलाची शरद पवार गटात एन्ट्री फिक्स

अजित पवार गटाच्या नरहरी झिरवळ यांच्या मुलाची शरद पवार गटात एन्ट्री फिक्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!