• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधातील आरोग्य मंत्र्यांच्या विधानान राजकारण तापलं!

Team Rajmudra by Team Rajmudra
October 3, 2024
in राजकीय
0
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधातील आरोग्य मंत्र्यांच्या विधानान राजकारण तापलं!
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना आता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते. पण ते गोमांस खात होते, असा दावा केला आहे.. इतकेच नाही तर त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केल्याचा खळबळजनक दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण असले तरी सार्वजनिक गोमांस खायचे. त्याचा प्रचार करायचे तसेच सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याबाबतीत त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले होते, असे गुंडुराव म्हणाले. त्यांचे विचार कट्टर असले तरी दुसऱ्या बाजूने ते आधुनिक होते असे ते म्हणाले. तसेच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद जिना यांचा उल्लेख केला. गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचे मूर्तिमंत उदाहरण होते. पण ते कट्टर शाकाहारी होते. त्याचवेळी तो लोकशाहीवादी नेते असल्याचे गुंडुराव म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नवीन वादाची ठिणगी पडली आहे.

गांधीजी एक धार्मिक व्यक्ती होते. आता हा कट्टरतावाद फोफावत आहेत. गोरक्षकांच्या नावाखाली कुणाला पण मारहाण करण्यात येते. त्यांना सावरकरांचे विचार माहिती नाहीत. सावरकरांच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी आजही गांधींजीचे विचार प्रेरक असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच दुसरीकडे भाजपा खासदार आणि वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केलेल्या सोशल मीडिया कमेंटमुळे नवा वादाला तोंड फुटले आहे. कंगना यांनी बुधवारी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल पोस्ट लिहिली होती. शास्त्रींना त्यांच्या 120 व्या जयंतीदिनी एका पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहताना त्यांनी महात्मा गांधींना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंआहे.

Tags: maharashtraमंत्री दिनेश गुंडुरावस्वातंत्र्यवीर सावरकर
Previous Post

ठाकरेंची तोफ धडाडणार? दसरा मेळाव्याच्याआधीच आचारसंहिता लागण्याची शक्यता

Next Post

मविआत जागावरून ठिणगी ; भंडारा-गोंदियातील सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

Next Post
मविआत जागावरून ठिणगी ; भंडारा-गोंदियातील सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

मविआत जागावरून ठिणगी ; भंडारा-गोंदियातील सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!