• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील 4136 उमेदवारांचे भवितव्य मतदान ठरवणार : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?

Team Rajmudra by Team Rajmudra
November 20, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
राज्यातील 4136 उमेदवारांचे भवितव्य मतदान ठरवणार : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?
Spread the love

राजमुद्रा : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून प्रत्येक नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बाजवताना दिसत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहेत . राज्यातील 4,136 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान ठरवणार आहे.. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होत आहे त्यामुळे दिग्दजाची प्रतिष्ठान निवडणुकीत पणाला लागली आहे..निवडणुकीत बारामती, इंदापूर, दौंड,नांदेड,येवला कवठेमहांकाळ माहीम, वरळी,कराड दक्षिण,कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागला आहे..

या निवडणुकीत महायुतीत भाजपा 148 जागा लढवत आहे. तर शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 53 जागांवर निवडणूक लढवित आहे. काँग्रेस 103, शिवसेना (उबाठा) 89 जागांवर लढत आहे. तर राष्ट्रवादीचे (एसपी) 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षानं 237 उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार 128 जागांवर निवडणूक लढत आहेत. काँग्रेसची राज्यभरात किमान 75 जागांवर थेट भाजपाबरोबर, सुमारे 41 जागांवर राष्ट्रवादी (एसपी) विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. तर सुमारे 53 जागांवर शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.

गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रचंड राजकीय हालचाली घडल्या आहेत. तसेच या निवडणुकीतून हे स्पष्ट होईल की जनता कोणत्या दृष्टीकोनाने पाहते, जनतेचं मत नेमकं कुणाच्या बाजूने आहे. याआधीही जनतेने लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने सर्वाधिक मतदान केलेलं बघायला मिळालं होतं. मात्र लोकसभेनंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सारख्या योजना महायुती सरकारकडून जाहीर झाल्या आहेत.याकारणामुळे निवडणुकीमध्ये मोठा उलटफेर होतो का? या गोष्टीकडे लक्ष देणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags: 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान
Previous Post

विधानसभेच्या धामधुमीत बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडेंवर गंभीर आरोप

Next Post

जळगाव शहर मविआच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Next Post
जळगाव शहर मविआच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव शहर मविआच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!