• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीच्या मंत्रीपदाचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी ; तोडगा निघणार?

Team Rajmudra by Team Rajmudra
December 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त कधी? मंत्र्याच्या याद्या मंजुरीसाठी दिल्ली दरबारी!
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार स्थापन होऊन आठवडा झाला तरी खाते वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या महायुती सरकारच्या घडामोडींसंदर्भात राज्यातील जनतेलाच नाही तर सर्वच आमदारांना प्रतिक्षा लागली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री दीड वाजता खलबते झाली.. मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही.. त्यामुळे आता महायुतीचा मंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते पुन्हा एकदा आज दुपारी दिल्ली दरबारी रवाना होणार आहेत. आता यावर तोडगा निघणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचं पारडं जड असल्याने मोठी खाती मिळवण्यासाठी भाजप आग्रही आहे.. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने ही दावा अजूनही सोडला नाही.. गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा आता तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत..ही भेट सद्धिच्छा भेट असणार आहे, असे सांगितले जात असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. त्यात विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे,अशी माहिती समोर आली आहे..

या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मेघदूत बंगल्यावर बैठक झाली. रात्री दिड वाजता एक तास खातेवाटपा संदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेतून अंतिम निर्णय झाला नाही. तिढा सुटत नसल्याने अखेर तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही दुसरीकडे बोलले जात आहे.. त्यामुळे दिल्ली दरबारी तर हा तिढा सुटणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Tags: bjpmaharashtra
Previous Post

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप : मविआ फुटणार ; भाजप “मिशन लोटस” राबवणार?

Next Post

लाडक्या बहिणींना टेन्शन : हमीपत्राच्या पडताळणीवर ठरणार योजनेचा लाभ?

Next Post
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी ; खानदेशातील “या” जिल्ह्यांचाही समावेश

लाडक्या बहिणींना टेन्शन : हमीपत्राच्या पडताळणीवर ठरणार योजनेचा लाभ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!