राजमुद्रा : राजधानी दिल्लीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत 27 वर्षानंतर सत्ता काबीज केली अन आम आदमी पक्षाचा दारुण पराभव केला.. या पक्षाच्या पराभवानंतर आता दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून आम आदमी पक्षात मोठा भूकंप झाला आहे.. आपच्या बड्या नेत्या अतिशी यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत आपचें राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना धक्कादायक पराभवाला समोर जावं लागले.. पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अतिशी यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला.. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची त्यांनी आज भेट घेत राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा दिसून आली मात्र सक्सेना यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.. पक्षाचा पराभवाने आपलाही खिंडार पडले..
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अतिशी यांच्याकडे मुख्यमंत्री पद आलं होतं.. मात्र लगेच या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.. जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवाल्याने या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर अतिशी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली होती. त्या दिल्लीच्या तिसरा महिला मुख्यमंत्री ठरल्या.. त्यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शिला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.. आता राजधानी दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..