• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तारादूतांच्या आत्मक्‍लेश आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 14, 2021
in जळगाव
0
तारादूतांच्या आत्मक्‍लेश आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) तारादूतांनी पुकारलेल्या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वर्किंग कमिटी सदस्य डॉ. पृथ्वीराज श्रीराम पाटील यांनी पारोळा तालुक्याचे तारादूत व सारथी समन्वयक सुनील देवरे यांना पत्र दिले आहे.

स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांच्या सूचनेनुसार हे पत्र तारादूत व सारथी समन्वयक सुनील देवरे यांना देण्यात आले असून यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे पारोळा तालुक्यातील मार्गदर्शक भिकनराव पाटील, सचिन पाटील, नितीन देसले, भरत पाटील, ईश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.

सारथी संस्था समस्त मराठा-कुणबी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी व विकासासाठी आहे. सारथी संस्थेचा आत्मा असलेला तारादूत प्रकल्प अजितदादांनी सुरु करण्याच्या सूचना देऊनही अद्यापही तारादूतांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे अंतर्गत मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी तारादूत प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट मध्ये प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर तारादूतांनी वेळोवेळी आंदोलनं केली.  छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा सारथी संस्थेच्या प्रमुख मागण्यांमध्ये तारादूत प्रकल्पाची मागणी केली.

19 जून रोजी अजितदादा पवार, छत्रपती संभाजी राजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तारादूत प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली व अजितदादा यांनी सारथी संस्थेच्या 13 मागण्यांपैकी सारथी तारादूत प्रकल्प चालू करण्याच्या सूचना संचालक मंडळाला दिल्या. परंतू सूचना देऊन 16 दिवस उलटूनही अद्यापर्यंत प्रकल्पाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे तारादूतांना नियुक्त्या न मिळाल्यास 15 जुलै पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनाचा त्यांनी पवित्रा घेतला आहे.

Tags: jalgaontaraduttaradut niyuktiupamukhmantri ajit pawar
Previous Post

जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक आर. एम. पाटील यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप

Next Post

सिईओंचा प्रत्येक आढाव्यावर भर

Next Post
अपंग प्रमाणपत्र प्रकरणात चुकीला माफी नाही – सिईओ डॉ. पंकज आशिया

सिईओंचा प्रत्येक आढाव्यावर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!