(भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा) येथील मिरगव्हाण शिवारातील गट नं.९५ च्या अटीशर्तींचा भंग झाला असून याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याच्या तक्रारीवरुन विभागीय आयुक्त (महसुल) यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट क्र. ९५ ही जमिन अटी शर्तींवर घेतली होती. सदर जमिनीचा उपयोगक शेती कामासाठी करावा व जमिन कोणत्याही वर्षी पडीत ठेवू नये, या शर्तीवर घेतली आहे. मात्र सदरची शेत जमिन २००५-०६ पासून पडिक आहे. या जमिनीचा शेतीसाठी उपयोग होत नसल्याने अटी शर्तींचा भंग झाला असल्याची तक्रार येथिल माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे केली होती. मात्र याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने तक्रारदार यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार आयुक्त कार्यालयातून सदर तक्रारीच्या अनुषंगाने जमीन मालक कांताबाई बन्सीलाल बियाणी यांची चौकशी करुन शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती उचित कारवाई करण्यात यावी व कारवाईबाबात तक्रारदार यांना एक प्रत व एक प्रत आयुक्त (महसुल) कार्यालय नाशिक यांच्याकडे पाठवावी असे आदेश तहसीलदार (महसुल) विभागीत आयुक्त, नाशिक यांनी दिले आहेत.