• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना काळात कर्तव्य बजावताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळण्याची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 12, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोना महामारीच्या काळामध्ये बरेच कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र हे कर्तव्य बजावत असताना काही कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या परिस्थितीत ज्या कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला आहे अशा कर्मचाऱ्यांना कोविड विम्याचे संरक्षण दिले जाऊन भरपाई मिळावी अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. यासाठी तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी योजना राबवताना कोरोनाला रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत .जनसामान्यांना दिलासा देत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहे. या सर्व कामांमध्ये प्रशासना बरोबर अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विनाअनुदानित कर्मचारी तसेच कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी यांनी सुद्धा अत्यंत सेवाभावी पणे काम केले आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असताना अनेकांवर मृत्यू ओढवला असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या निराधार कुटुंबीयांचा माणुसकीच्या भूमिकेतून महाराष्ट्र सरकारने विव्हर करत सदर कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी फॅमिली पेन्शन तात्काळ सुरू करावी. तसेच जे कर्मचारी पेन्शन नियमात बसत नाहीत अशांना डीसीपीएस व एनपीएस कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावे. सदर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियमानुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी विशेष बाब म्हणून तातडीने सामावून घ्यावे अशा विविध मागण्या आमदार सुधीर तांबे यांनी आपल्या पत्रात नमूद केल्या आहेत.

याचबरोबर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे तसेच कोणतेही लक्षण असेल तर तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, कर्तव्य बजावत असलेल्या बांधवांनीही कर्तव्य बजावताना डबल मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे किंवा कोणतीही लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही आमदार सुधीर तांबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: ajit pawarbalasaheb thoratcoronacovidmaharashtrarajmudrasudhir tambeuddhav thakrevarsha gayakvad
Previous Post

18 ते 44 गटाला राज्यांच्या लस खरेदीची परवानगी, मात्र केंद्राच्या मर्यादा

Next Post

मराठा आरक्षणावर अहवाल सादरीकरणासाठी समिती स्थापन

Next Post

मराठा आरक्षणावर अहवाल सादरीकरणासाठी समिती स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!