• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटलांनी काढले एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांना चिमटे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 15, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | “सध्याचे सरकार कसे सत्तेत आले, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला व त्यात तुमच्या गुलाबरावचा उत्तर महाराष्ट्रातून दुसऱ्यांदा मंत्री म्हणून समावेश झाला. योगायोगाने जळगाव जिल्ह्यात पाण्याचेच खाते येते. एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांकडे जलसंपदा खाते तर माझ्याकडे पाणीपुरवठा! ते चारीने देत होते, मी पाईपने थेट घरोघरी पोहोचवतो!” असे वक्तव्य करत पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्कील चिमटे काढले.

जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे ९५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कासोदा हे प्रेम करणारे गाव असून या परिसरानेच आपल्याला मोठे केले, असे कृतज्ञापूर्वक उद्गार गुलाबराव यांनी काढले. मात्र, त्यांनी भाषणाच्या ओघात अप्रत्यक्षरित्या कासोदा परिसराकडे दुर्लक्ष आणि कार्यक्षमतेबद्दल शिवसेनेचेच आमदार चिमणराव पाटील यांना टोलाही लगावला. “गेली अनेक वर्षे कासोदा परिसर पाणी-पाणी करतोय. शेवटी आपणच १६ गावांचा पाणीपुरवठा योजनेत समावेश करून घेतला,” असे सांगत गुलाबरावांनी या परिसराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे श्रेय स्वतःकडे घेतले.

याप्रसंगी चिमणराव पाटील म्हणाले, “जोपर्यंत कोणत्याही पाणीपुरवठा योजनेला शाश्वत (कायमस्वरूपी) स्त्रोत मिळत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा योजना चालणार नाही. जर अंजनी धरण भरले नाही तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही कासोदा गावाला पाणी मिळणार नाही. त्यासाठी अंजनी धरणावरून स्त्रोत बदलून गिरणातून पाणी लिफ्टिंग कराव लागेल. तसे केले तरच ही योजना उत्तमप्रकारे चालेल.

गुलाबराव पाटील यांच्यासोबत असलेल्या गैरसमजाबाबत बोलतांना चिमणराव म्हणाले, पालकमंत्री व माझ्या संबंधांत काही गैरसमज होते. मतभेद हे नातेसंबंधामध्येच होतात; परंतु आम्ही दोघे एकमेकांचे शत्रू नाहीत. आमचे दोघांचे जमत नाही, असा गैरसमज आता कुणी करुन घेऊ नये. आमचे आता चांगले जमते.

Tags: eknath khadsegirish mahajanpalakmantri gulabrao patil
Previous Post

संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पदाधिकारी आढावा बैठक सावद्यात संपन्न

Next Post
राष्ट्रवादी कॉंग्रेसची पदाधिकारी आढावा बैठक सावद्यात संपन्न

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पदाधिकारी आढावा बैठक सावद्यात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!