• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनात पालक गमवलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ ; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 19, 2021
in शैक्षणिक
0
कोरोनात पालक गमवलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ ; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय..!
Spread the love

 

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने ज्या विद्यार्थ्यांनी करोनामुळे आपले पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात आले असल्याचे विद्यापिठातर्फे सांगण्यात आले आहे.

सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फी मध्ये सवलत देण्याबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सोबत सादर केला होता. त्यानंतर कुलगुरूंनी समितीचा अहवाल स्वीकारला आणि शिफारसी मंजूर केल्या. त्यानुसार, विद्यापिठाने विविध अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले.

दरम्यान, करोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत त्यांना फीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही फी मध्ये कपात केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी लागू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे. वसतिगृह/ निवास शुल्क तेव्हाच लागू होईल जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येतील.

Tags: coronapunesavitribai fule pune vidyapith
Previous Post

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यां सोबत पालकमंत्र्यांची बैठक ; वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला मिळणार चालना

Next Post

‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत, भाजपचे सरकार पुन्हा येणार’ – नारायण राणे

Next Post
‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत, भाजपचे सरकार पुन्हा येणार’ – नारायण राणे

‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत, भाजपचे सरकार पुन्हा येणार’ – नारायण राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!