• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर गाळेधारकांचा पाचपट दंड केला रद्द; शासनाचा निर्णय

गाळेधारकांना मोठा दिलासा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 19, 2021
in जळगाव, महानगरपालिका
0
अखेर गाळेधारकांचा पाचपट दंड केला रद्द; शासनाचा निर्णय
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या २६०८ गाळेधारकांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे. महासभेच्या ठरावानुसार आकारण्यात आलेला पाचपट दंड नगरविकास विभागाने रद्द केला आहे. गाळेधारकांकडून भाड्याची रक्कम त्या वर्षाच्या रेडी रेकनर नुसार तर थकीत रकमेवर दोन टक्के शास्ती आकारण्याचे आदेश नगरविकास विभागाने मनपा आयुक्तांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे गाळेधारकांच्या बिलातून किमान २५ टक्के रक्कम कमी होणार आहे.

मनपाच्या मालकीचे शहरात २७ व्यापारी संकुल आहेत. त्यापैकी २० संकुलातील २६०८ गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपली आहे. नऊ वर्षे उलटूनही मनपा मालकीच्या गाळ्याचे नूतनीकरण अथवा लिलाव होऊ शकलेला नाही. मुदत संपूनही गाळेधारक पैसे भरत नसल्याने तसेच गाळ्यांचा ताबा सोडत नसल्याने महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी खानदेश विकास आघाडीने गाळेधारकांना पाचपट दंड आकारण्याचा ठराव केला होता. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर पाचपट दंड रद्द करण्याचा ठराव २१ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आला होता. या ठरावानुसार पाचपट दंड रद्द करण्याची मागणी गाळेधारक संघटनांनी लावून धरली होती.

महापालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पाचपट दंड रद्द करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू होते. गेल्या आठवड्यात गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. अखेर मंगळवारी नगर विकास विभागाने आयुक्तांना आदेश देत पाचपट दंड रद्द केला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गाळेधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान मनपाने पाचपट दंडासह बजावलेल्या बिलाची मागणी सुमारे २२० कोटी होती. आता पाचपट दंड रद्द केल्याने एकूण बिलातील रक्कम पाच कोटीने कमी होईल. मुदत संपलेल्या गाळेधारकांना पैकी २५० ते ३०० गाळेधारकांनी तक्रार कायम ठेवून पाचपट दंडासह बिलाचा भरणा केला आहे. या गाळेधारकांच्या अतिरिक्त रक्कम आगामी बिलात समायोजित होतील असे सांगण्यात आले.

Tags: galedharakmanapa jalgaonnagarvikas vibhag
Previous Post

४२ कोटींची कामे रद्द करून स्थगिती उठवा; मनपाचे नगरविकास विभागाला पत्र

Next Post

जिल्हा बँक निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड

Next Post
जिल्हा बँक निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड

जिल्हा बँक निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!