• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिण्याच्या पाण्याच्या दूषित कारणावरून साकेगावात राजकारण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 16, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

(भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा) भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत परिसरात पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि जंत असल्याची तक्रार नागरिकांकडून प्रशासनाला केली होती. प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे तसेच ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे याबाबतच्या सतत तक्रारी करूनही साकेगाव ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा गटनेता रविंद्र पाटील यांनी केला आहे.

रवींद्र पाटील तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून गावात गेल्या आठ पंधरा दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्यामध्ये मार फार मोठ्या प्रमाणावर जंत आणि घाण असून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे दाखवले आहे. याबाबत सतत तक्रार करूनही त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप साकेगावच्या नागरिकांनी केला आहे. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद गट नेते असलेल्या रवींद्र पाटलांनी येत्या दोन दिवसात या समस्येवर तोडगा काढला नाही तर साकेगाव ग्रामस्थांना सोबत घेऊन मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली जाईल असा इशारा दिला आहे.

याबाबत साकेगावचे प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे यांना विचारले असता हे पाणी दूषित नसून यामध्ये डस्ट पार्टिकल आहेत असे सांगितले. असे असले तरी या बाबतच्या समस्या सोडवण्यासाठी आदेश देण्यात आले असून पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याबात योग्य ती कारवाई केली जाणार आहे. असे असताना विरोधकांनी मुद्दाम हा मुद्दा उचलून धरला असून विरोधकांना आपला पराभव पचवता आला नसल्याने हट असे आरोप करत असल्याचा टोला लगावला आहे.

साकेगावात पिण्याच्या पाण्यावरून मोठी समस्या निर्माण झाली असली तरी यात राजकीय घडामोडींचा ऊहापोह दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या विषयाला घेऊन आता कोणत्या स्तरावर वाद वाढण्याची शक्यता आहे याकडे भुसावळकरांचे लक्ष लागून असणार आहे. आता या परिस्थितीत साकेगावतील गळती पाईपलाईन आणि दूषित पाण्याचा प्रश्न किती दिवसात सोडवला जाईल हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags: aanada thakrebhusawalgrampanchayatrajmudraravindra patilsakegaon
Previous Post

चक्रीवादळाच्या रौद्ररूपाने गोवा प्रशासनाला हादरा

Next Post

कोरोना पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचा महत्वाचा निर्णय

Next Post

कोरोना पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचा महत्वाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!