• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांची आत्महत्या वाढण्याची भीती – विजय वडेट्टीवार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in राजकीय
0
शेतकऱ्यांची आत्महत्या वाढण्याची भीती – विजय वडेट्टीवार
Spread the love

नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा । पावसाने संपूर्ण राज्याला झोडपले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ करायचा याचा विचार सुरू आहे, असं सांगतानाच अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भीती व्यक्त केली. शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होईल. राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत होईल. ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा की संपूर्ण राज्यात जाहीर करायचा याबाबत विचार सुरू आहे. जिल्ह्यांमधील नुकसानीची माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकरी संकटात आला की सर्वच पक्षाची शेतकऱ्यांना मदतीची मागणी असते. मराठवाड्यात 17 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याहीपेक्षा अधिक नुकसान झालेलं असू शकतं, असं त्यांनी सांगितलं. पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी महापुराचं खापर जलयुक्त शिवारावर फोडलं आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतुल देऊळगावकर तज्ज्ञ आहेत. त्यांची मतं काय आहेत त्यावर विचार होईल, असं ते म्हणाले.

 

 

 

 

 

 

Tags: vijay vadettiwar
Previous Post

राज्यपाल भवन हा राजकीय अड्डा तर न्हवे ना ? नवाब मलिक यांचा आरोप

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Next Post
आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!