• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाटा समूहाची झाली एअर इंडिया, अजय सिंह यांनी टाटापेक्षा लावली कमी बोली..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 1, 2021
in Uncategorized
0
टाटा समूहाची झाली एअर इंडिया, अजय सिंह यांनी टाटापेक्षा लावली कमी बोली..
Spread the love

नवी दिल्ली राजमुदा वृत्तसेवा । 68 वर्षांनंतर पुन्हा टाटा समूहाची होणार एअर इंडिया. टाटांनी 1932 मध्ये एअर इंडिया सुरू केली होती. सरकार एअर इंडियाची दुसरी कंपनी एअर इंडिया सॅट्स मधील 50% हिस्सा विकणार आहे. एअर इंडियासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एअर इंडियाची राखीव किंमत 15,000 ते 20,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती.

टाटा समूहाने स्पाइसजेटचे चेअरमन अजय सिंह यांच्यापेक्षा सुमारे 3,000 कोटी रुपयांची अधिक बोली लावली होती. अशाप्रकारे एअर इंडिया जवळपास 68 वर्षांनंतर मायदेशी परतली आहे. एअर इंडियासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर होती. तेव्हापासून असा अंदाज होता की टाटा समूह एअर इंडियाला खरेदी करू शकतो.

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. टाटा समूहाचे जेआरडी टाटा हे त्याचे संस्थापक होते. ते स्वतः पायलट होते. तेव्हा याचे नाव टाटा सर्व्हिस ठेवण्यात आले. 1938 पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ती सरकारी कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर सरकारने त्यात 49% हिस्सा विकत घेतला.या कराराअंतर्गत मुंबईतील एअर इंडियाचे मुख्य कार्यालय आणि दिल्लीतील एअरलाइन्स हाऊसचाही समावेश आहे.

अनेक वर्षांपासून कर्जबाजारी असलेल्या एअर इंडियाला विकण्याच्या आपल्या योजनेत सरकार अपयशी ठरले. सरकारने 2018 मध्ये 76% हिस्सेदारी विकण्यासाठी बोली मागवली होती. मात्र, त्या वेळी सरकार व्यवस्थापन नियंत्रण स्वतःकडे ठेवण्याबाबत बोलले होते. जेव्हा कोणी त्यात स्वारस्य दाखवले नाही, तेव्हा सरकारने व्यवस्थापन नियंत्रणासह कंपनी 100% विकण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच, हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले होते की, बोलीची तारीख 15 सप्टेंबरनंतर वाढवली जाणार नाही.

या व्यतिरिक्त, सरकारने कर्मचाऱ्यांना 10% आणि घरगुती वित्तीय संस्थांना 10% हिस्सा देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर एअर इंडियामधील सरकारचा हिस्सा 40%पर्यंत खाली आला असता. मात्र, त्यानंतर गेल्या 21 वर्षांपासून एअर इंडियाला विकण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने प्रकरण अडकले.

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम : योजना, वर्षातून एकदा मोफत आरोग्य चाचणी

Next Post

‘जलयुक्त शिवार’ योजनेत भ्रष्टाचारप्रकरणी एसीबीकडून चौकशी सुरू…

Next Post
‘जलयुक्त शिवार’ योजनेत भ्रष्टाचारप्रकरणी एसीबीकडून चौकशी सुरू…

'जलयुक्त शिवार' योजनेत भ्रष्टाचारप्रकरणी एसीबीकडून चौकशी सुरू...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!