• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा. सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 2, 2021
in Uncategorized
0
खा. सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले ?
Spread the love

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्याने पुन्हा एकदा आपणच सत्तेत येणार असल्याचं सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांचं म्हणणं फेटाळून लावलं आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार हे केवळ राजकीय भाष्य आहे. यामध्ये फारसं काही नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

सुनील तटकरे आज पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. यावेळी त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीवर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा आपत्ती आल्या. मात्र त्यांनाही अशी मदत करता आली नाही. केंद्र सरकारने निकष बदलून राज्याला मदत करावी, असं तटकरे म्हणाले.

शरद पवार आणि नितीन गडकरीमंध्ये मुंबई-गोवा महामार्गाबाबत चर्चा झाली. आजची बैठक ही फलद्रुप झाली. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असं सांगतानाच शरद पवार आणि नितीन गडकरी एकत्रित प्रवास करत आहेत. यावेळी मराठवाड्यातील नुकसानसंदर्भात चर्चा होऊ शकते. या दोन्ही नेत्यांच्या आजच्या बैठकीत राजकीय काही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार आणि नितीन गडकरींमध्ये वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा झाली. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भात संदर्भातही चर्चा झाली, विमानतळासमोरची 12 एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्यासंदर्भात चर्चा झाली. गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरचं दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल. मी नितीन गडकरींना पत्र दिलंय, असं भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.

 

 

Previous Post

पाचोरा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्या.. संजय वाघ यांची मागणी

Next Post

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले निर्गमित आदेश…

Next Post
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले निर्गमित आदेश…

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले निर्गमित आदेश...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!